Marathi Biodata Maker

राज्यात ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद

Webdunia
रविवार, 25 एप्रिल 2021 (08:51 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असून शनिवारी ६७,१६० नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ लाख २८ हजार ८३६ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ९४ हजार ४८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात ६७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७१, रायगड २०, नाशिक ३५, अहमदनगर ३०, पुणे २२, सोलापूर ४८, सातारा २३, रत्नागिरी २५, हिंगोली ११, लातूर २९, उस्मानाबाद १२, बीड २८, नांदेड ६१, अमरावती १०, यवतमाळ २५, नागपूर ५७, वर्धा २०, भंडारा २५, गडचिरोली २२ यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१ टक्के एवढा आहे. तर  ६३,८१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०२ टक्के एवढे झाले आहे.
 
मुंबईत ५८६७ नवे रुग्ण
मुंबईत शनिवारी ५८६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ६ लाख २२ हजार १४६ इतकी झाली आहे. तसेच शनिवारी कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण १२ हजार ७२६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने महसूल सहायकाला अटक केली

LIVE: महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

DC vs PBKS: पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला

मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार

पुढील लेख
Show comments