Dharma Sangrah

मुंबईत नाकावाटे लसीकरणाला प्रारंभ

Webdunia
गुरूवार, 27 एप्रिल 2023 (21:26 IST)
मुंबईत पुन्हा एकदा डोके वर काढणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकरांना 24 लसीकरण केंद्रांवर आता नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक लस देण्यात येणार आहे. या कोरोना-19 प्रतिबंधक लसीकरणाला 28 एप्रिलपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. मात्र 60 वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, त्यांनी कोविशिल्ड अथवा ची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.
कोवॅक्सिन
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) संजय कुऱ्हाडे हे स्वतः लक्ष घालून कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक लसीकरण व अन्य उपाययोजना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मार्गी लावत आहेत. आतापर्यंत 2 कोटी 21 लाख 96 हजार 995 नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली होती. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर 1 मे 2021 पासून 18 वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले होते. कोरोना-19 लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन/बूस्टर डोस) 10 जानेवारी 2022 पासून देण्यात येत आहेत. 26 एप्रिल अखेरपर्यंत 2 कोटी 21 लाख 96 हजार 995 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बिबटे 'वनतारा' मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला

ठाण्यात पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, आरोपी फरार

भाजप आमदार गोविंद सिंग परमार यांचे निधन

हार्ट अटॅक नाही तर हत्या! प्रियकरासाठी पत्नीनेच घेतला पतीचा बळी; २० दिवसांतच थाटला नवीन संसार

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केलेले अर्थसंकल्प, महायुतीने दिलेले वचन पाळले: एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments