Marathi Biodata Maker

श्रीलंकेनंतर युएईने दिली ऑफर

Webdunia
सोमवार, 11 मे 2020 (10:44 IST)
मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. कोरोना व्हायरस नसता तर आयपीएलचा 13वा हंगाम आता पिकवर असता. कारण नियोजित वेळेनुसार आयपीएल 29 मार्चपासून सुरू होणार होती आणि 24 मे रोजी फायनल सामना होणार होता. असे झाले असते तर आता क्वालीफायर मॅच खेळण्यासाठी कोणत्या संघाला किती सामने जिंकावे लागतील आदी चर्चा सुरू असत. पण करोनाने सर्व काही बिघड बीसीसीआयने ही स्पर्धा प्रथम 14 एप्रिलपर्यंत स्थगित केली होती. पण त्यानंतर कोरोना संकट वाढल्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे.

जोपर्यंत सरकारकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत स्पर्धा होणार नाही, असे बीसीसीआयच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. भविष्यात ही स्पर्धा होईल की नाही याबद्दल कोणी सांगण्यास तयार नाही. दरम्यान, आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी काही दिवसांपूर्वी श्रीलंकेने दाखवली होती. लंकने बीसीसीआयला तशी ऑफर दिली होती. अर्थात बीसीसीआयने या ऑफरमध्ये फारसा रस दाखवला नाही. आता लंकेनंतर आणखी एका देशाने आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे.

युएईने बीसीसीआयला घेण्याची ऑफर दिली आहे. करोना संकटामुळे यावर्षी स्पर्धा परदेशात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी देखील ही बाब मान्य केली आहे. अर्थात बीसीसीआयने श्रीलंका असो की युएई या दोन्ही देशांच्या ऑफरवर कोणताही विचार केला नाही. कारण कोणत्याही मोठ्या देशात अद्याप क्रिकेटला सुरुवात झालेली नाही. अद्याप आंतरराष्ट्रीय विमान सेवाच सुरू झालेली नाही. त्यामुळे असा निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे अरुण धूमल यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा! प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा केली

LIVE: संजय राऊत यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा रद्द

नांदेडमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली; ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यवतमाळला मोठी भेट दिली, ५७० कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेला मंजुरी

सिक्कीममध्ये दोनदा भूकंपाचे धक्के बसले; लोकांमध्ये घबराट पसरली

पुढील लेख
Show comments