Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पुन्हा एकदा ६ हजार १८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Webdunia
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (08:53 IST)
महाराष्ट्रात शुक्रवारी ६ हजार १८५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ८५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ८ हजार ५५० इतकी झाली आहे. यापैकी १६ लाख ७२ हजार ६२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये ४ हजार ८०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात १६ लाख ७२ हजार ६२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 
 
राज्यात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ७२ हजार ६२७ रुग्ण बरे झाल्याने महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.४८ टक्के इतका झाला आहे. तर महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८५ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा २.५९ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६ लाख ३५ हजार ६०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ८ हजार ५५० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 
सध्या राज्यात ५ लाख २८ हजार ३९५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ७ हजार २४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८७ हजार ९६९ रुग्ण उपचार घेत आहेत. आज नोंद झालेल्या ८५ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित चार मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही कमी अधिक कालावाधीपूर्वीचे आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments