Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

३ मे पर्यंत रेल्वे आहे पूर्ण बंद मात्र ई-तिकीट प्रवाशांना रद्द करण्याची गरज नाही

Webdunia
गुरूवार, 16 एप्रिल 2020 (08:46 IST)
देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे देशातील प्रवासी रेल्वे सेवा बंद राहणार असून फक्त मालवाहतूक सुरु आहे. आयआरसीटीसीने मंगळवारी स्पष्ट केले की, 3 मे पर्यंत रद्द केलेल्या गाड्यांचे ई-तिकीट प्रवाशांना रद्द करण्याची गरज नाही. एएनआयच्या ट्विटनुसार आयआरसीटीसीने प्रवाशांना सांगितले आहे की, रद्द करण्यात आलेल्या गाड्यांचे ई-तिकीट रद्द करण्याची गरज नाही. प्रवाशांना त्यांच्या तिकीटेचा परततावा मिळेल. ई-तिकीट आपोआप रद्द होईल आणि प्रवाशांना संपूर्ण परतावा मिळेल असे आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे.
 
देशात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चपासून 3 मे पर्यंत देशभर लॉकडाऊन सुरु ठेवण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, देशात कोरोना व्हायरसचा संसर्गाचा पसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवणे गरजेचे आहे. देशव्यापी लॉकडाऊन वाढवल्यानंतर भारतीय रेल्वेने 3 मे पर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर तिकिट रद्द करणे आणि परताव्यसंदर्भात आयआरसीटीसीकडून माहिती देण्यात आली आहे.
 
तत्पूर्वी, भारतीय रेल्वेने सांगितले की, प्रिमियम गाड्या, मेल/एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वेसह सर्व प्रवासी गाड्यांची सेवा 3 मे 2020 पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. लॉकडाऊन वाढवल्यानंतर सर्व देशी आणि आंतरराष्ट्रीय उड्डेणेदेखील 3 मे रोजी रात्री 11.59 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. नागरी उड्डायन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments