suvichar

करोना पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी शिवभोजन योजना सुरु करा

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2020 (17:40 IST)
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनता तसेच कामगारवर्ग यांना अल्पदरात भोजन मिळावे यासाठी जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा विस्तार करून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी 
संबंधितांना दिले आहेत लातूरचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेशी संपर्क करून पालक मंत्री देशमुख यांनी लवकरात लवकर म्हणजे येत्या एक-दोन दिवसात लातूर जिल्ह्यातील सर्व म्हणजे १० तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन योजना सुरू होईल या पद्धतीने तातडीने कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत.
 
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सध्या लॉकडाउन ची स्थिती आहे. या परिस्थितीत गरीब जनता तसेच कामगारवर्ग भोजनावाचून वंचित राहूनये यासाठी शासनाच्या वतीने या शिवभोजन योजनेचा विस्तार केला जात आहे, सर्व तालुक्याच्या ठिकाणी योजना सुरु होत असताना लातूर ग्रामीण साठी मुरुड याठिकाणी ही सोय 
केली जाणार आहे. गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करून याठिकाणी सामाजिक आंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळले जावेत असेही देशमुख यांनी म्हटले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

हर्षा ऋचरिया हर्षानंद गिरी बनल्या, उज्जैनमध्ये संन्यास घेतला, संतांचा विरोध

LIVE: महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील बदल्या आणि नियुक्तीचे आदेश जारी केले

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य! उपजीविका जाणार का? काय म्हणाले मंत्री सरनाईक

PM Kisan Yojana : 23वा हप्ता लवकरच

मुंबईत शाळा बेकायदेशीरपणे चालवल्या जात आहे," किरीट सोमैया यांनी गंभीर आरोप केले

पुढील लेख
Show comments