Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

350 किलोमीटर पायपीट केल्यानंतर मजुराची आत्महत्या

Suicide
Webdunia
शनिवार, 2 मे 2020 (13:53 IST)
लॉकडाऊनमुळे चालत घराच्या दिशेने निघालेल्या मजुराने 350 किलोमीटर अंतर कापल्यानंतर रस्त्यातच आत्महत्या केल्याची घटना घडली. 
 
मूळचे गोंदियाचे असलेले 40 वर्षीय अमरसिंह मडावी हे हैदराबादमध्ये बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. पण लॉकडाऊनमुळे त्यांचं काम बंद पडलं. चार दिवस वाट पाहिल्यानंतरही वाहन उपलब्ध न झाल्याने ते आणि त्यांच्या सहकाऱ्याने गोंदियाला पायी जाण्याचा निर्णय घेतला.
 
सुमारे 350 किलोमीटर अंतर कापून वर्ध्यातील गिरडपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना एक ट्रक मिळाली. पण अमरसिंह लघुशंकेला गेले असताना ट्रक त्यांना सोडून गेला. जागा अनोळखी असल्याने आणि एकटेच असल्यामुळे त्यांनी शेतात गळफास घेतल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
 
उपासमार, बेकारी, निराशा यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्याला गिरडचे ठाणेदार महेंद्र सूर्यवंशी यांनीही दुजोरा दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख
Show comments