Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार

Webdunia
शनिवार, 6 मार्च 2021 (23:17 IST)
राज्यात जवळपास पाच महिन्यानंतर २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून, केंद्र सरकारही सावध झालं आहे.  महाराष्ट्र आणि पंजाबमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून पथकं पाठवण्यात येणार आहेत. ही पथकं राज्य सरकारांसोबत करोना परिस्थितीवर नजर ठेवण्याबरोबरच संक्रमण नियंत्रण आणि साखळी तोडण्यासाठी राज्यांच्या आरोग्य विभागांना मदत करणार आहे.
 
राज्यात ५ मार्च रोजी २४ तासात १०,२१६ नव्या रुग्णांची नोंद झाली. करोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ९० हजारांच्या आसपास झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक १२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर पुणे शहर ८४९, पिंपरी-चिंचवड ५४९, उर्वरित पुणे जिल्हा ३६९, नाशिक शहर ३५२, जळगाव जिल्हा ५४०, सातारा २१४, औरंगाबाद ३१८, अकोला १४८, अमरावती शहर ४३५, यवतमाळ २५१, वाशिम २०७ नवे रुग्ण आढळले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

ब्लू ओरिजिनने रचला इतिहास, पॉप स्टार केटी पेरीसह 6 महिला अंतराळ प्रवास करून परतल्या पेरी आणि किंग यांनी गुडघे टेकत जमिनीचे चुंबन घेतले

PBKS vs KKR: आयपीएलचा 31 वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

नागपुरात रेस्टॉरंट मालकाची गोळ्या घालून हत्या

मुंबई: दादर हिंदमाता पुलावर एमएसआरटीसी बसने दोन दुचाकीस्वारांना चिरडले

LIVE: बुलढाण्यात भीषण रस्ता अपघात

पुढील लेख
Show comments