Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, रेमडेसीवीरविषयी आरोग्यमंत्री काय बोलले

Webdunia
शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (08:32 IST)
रेमडेसीवीर हे इंजेक्शन काही संजीवनी नाही. या इंजेक्शनमुळे रुग्णांचा जीव वाचेलच असं नाही, अशी धक्कादायक कबुली आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टोपे यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 
 
राजेश टोपे हे पू्र्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरमधील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे धक्कादायक विधान केलं. नागपूरात रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. पण रेमडेसीवीर ही काही संजीवनी नाही, त्याने रुग्णांचा जीव वाचतोच असं नाही. ज्याला गरज आहे त्यालाच ते इंजेक्शन द्यायला हवं, रेमडेसीवीर इंजेक्शन कुणाला द्यायचं, याबाबत कोव्हिड टास्कफोर्समार्फत राज्यातील सर्व डॉक्टरांना गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
 
यावेळी त्यांनी नागपूर कोरोनाचं हॉटस्पॉट बनल्याची कबुली देत नागपुरातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मेडिकलमध्ये कोव्हिडचे 500 बेड्स वाढवण्याच्या आणि एम्समध्ये 500 ऑक्सिजन बेड वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments