Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताच्या पराभवाची कारणे..

Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2015 (11:06 IST)
* ऑस्ट्रेलिाविरुध्दची लढत सोपी नव्हती, परंतु असा एकतर्फी पराभव अपेक्षित नव्हता.
 
* नाणेफेकीत हार : नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली. ऑस्ट्रेलिया 350 धावा करेल, असेच वाटत होते. मात्र भारती गोलंदाजांनी 328 वर त्यांना रोखले. अर्थात ही धावसंख्या मोठीच होती.
 
* भारताला उशिरा यश : वॉर्नरला भारताने झटपट बाद केले, मात्र स्टीव्हन स्मिथने 93 चेंडूत 105 धावा काढल्या.
 
* फलंदाजी : ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ही त्यांची शक्ती ठरली. 33व्या षटकाअखेर 1 बाद 181 वर असणार्‍या कांगारूंची अवस्था 43 व षटकात 5 बाद 250 झाली. मात्र जॉन्सनचे 9 चेंडूत 27, फॉल्कनरचे 12 चेंडूत 21 व फिंचच्या 81 धावांमुळे त्यांनी डोंगर रचला.
 
* गोलंदाजी ढेपाळली : भारताची गोलंदाजी महत्त्वाच्या टप्प्यावर ढेपाळली. डेथ ओव्हर्समध्ये शमी अपयशी ठरला, अश्विन वगळता सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले. यंदाच्या विश्वचषकात गोलंदाजांना सर्व 10 बळी मिळविता आले नाहीत.
 
* आघाडीची फळी अपयशी : 328 धावांचे आव्हान असताना पहिले तीन फलंदाज खेळणे आवश्क होते. रोहित व शिखरपैकी एकाने 70 पेक्षा जास्त धावा करणे गरजेचे होते.
 
* मधली फळीदेखील कोसळली : 18 षटकात 3 बाद 91 नंतर कोणीतरी एकाने टिच्चून फलंदाजी करणे आवश्क होते. रहाणे 44 व धोनी 65 यांनी प्रतिकार केला, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सातत्याने दबाव ठेवत भारतासाठीची आवश्यक धावगती अशक्यप्राय करून ठेवली.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

Show comments