rashifal-2026

पॉली उम्रीगर

वेबदुनिया
WD
जुन्या काळातील पॉली उम्रीगर हे एक श्रेष्ठ क्रिकेटपटू. त्यांचा जन्म 28 मार्च 1926 रोजी सोलापूर येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव पहलान रतनजी उम्रीगर. त्यांच्या वडीलांची कापडाची कंपनी होती. नंतर त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले.

पॉली उम्रीगर यांचे शिक्षण मुंबईत झाले. 1944मध्ये झालेल्या बॉम्बे पेंटॅग्युलर स्पर्धेत ते पारसी संघातर्फे खेळले. हा त्यांचा प्रथम श्रेणीतील पहिला सामना. त्यावेळी ते अठरा वर्षांचे होते. भारतीय कसोटी संघात त्यांची निवड झाली 1948मध्ये. वेस्ट इंडिजविरोधात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसर्‍या कसोटीसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली.

1955 ते 1958 याकाळात ते भारतीय संघाचे कर्णधार होते. पॉली उम्रीगर मध्यम फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. 1962मध्ये ते कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले तेव्हा त्यांनी इतर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूपेक्षा अधिक कसोटी म्हणजे 59 खेळल्या होत्या. त्यांची धावसंख्याही त्यावेळच्या भारतीय फलंदजांपेक्षा अधिक होती. त्यांनी एकूण 3,631 धावा काढल्या. त्यात बारा शतकांचा समावेश होता. त्यावेळी भारतात सर्वाधिक शतकांचा विक्रमही त्यांच्या नावे होता. पहिले द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. न्यूझीलंडविरोधात त्यांनी द्वीशतक ठोकले होते. 7 नोव्हेंबर 2006 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

भारत अफगाणिस्तानसोबत एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार, बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले

ZIM vs SA :दक्षिण आफ्रिकेकडून झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव करत सुपर एट मध्ये प्रवेश

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

सेमीफायनलमध्ये लंकेवर ५ धावांनी विजय मिळवूनही पाकिस्तान टी-२० विश्वचषकातून बाहेर

IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका २-० अशी जिंकली

Show comments