Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोज तिवारी यांचा दिल्ली विजयाचा दावा

Webdunia
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (11:17 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष विजी होईल, असा अंदाज सर्वच एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. मात्र, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाजपच्या विजाचा दावा केला आहे. मतदानाच्या अखेरच्या तीन तासात झालेल्या मतदानामुळे भाजप विजयी होणार असल्याचे त्यांनी गणित मांडले आहे. 
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अखेरच दोन तासामध्ये 17 टक्के मतदान झाले असल्याचे तिवारी यांनी सांगितले. ईव्हीएम मतदानाची आकडेवारी ही दुपारी तीन वाजेपर्यंतची आहे. एक्झिट पोल करणार्‍या संस्थांनीदेखील ही आकडेवारी तीन वाजेपर्यंतची असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, दुपारी तीन ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत भाजपला अनुकूल मतदान झाले असल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे. तर, आम आदमी पक्षानेदेखील दुपारी तीननंतर झालेले मतदान आपल्याच बाजूने झाल्याचा दावा केला आहे.
 
भाजप नेते बी. एल. संतोष यांनीदेखील ट्विट करून एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अखेरच्या काही तासांत झालेले मतदान, ईव्हीए मशीनबाबत संशय निर्माण होईल, असे आपकडून होणारा प्रचार याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

MI vs RCB: विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत 3 'निर्भया' सायबर लॅबचे उद्घाटन केले

आरोग्य विभागाने पहिला अहवाल पोलिसांना सादर केला,दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चूक असल्याचे म्हटले

सुप्रिया सुळे तनिषाच्या कुटुंबाला भेटणार,या प्रकरणात दिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आणखी एका स्वप्नातील प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments