मैत्रीमध्ये श्रीमंत व गरीब अशी कधी न भरून निघणारी दरी निर्माण झाली आहे. गरीब घरची मुले व बड्या आसामींची मुले यांच्यात मैत्री होतांना दिसत नाही. त्यांच्या मैत्री झाली तरी ती शंभरातून एक असते व तीही काही दिवसातच विरून जाते. त्यांच्यात मैत्री झाली तरी त्यांच्यात योग्य पध्दतीने समन्वय साधला जात नाही. बड्या आसामींच्या मुले ही पैशात खेळत असल्याने त्यांना त्या पैशाची किंमत नसते व गरीब घरच्या मुलाला मात्र पैसा हा मृगजळासारखा असतो. त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली तरी ती जास्त काळ टिकणारी नसते. मैत्री करताना श्रीमंत व गरीब असे पाहिले जात नाही. मैत्री म्हणजे मित्राला सुख बरोबरच दु:खात देखील मदत केली पाहिजे. मग आपण या 'फ्रेंडशिप डे' पासूनच श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीला डोळ्यासमोर आणून मैत्री मध्ये दरी निर्माण करणारी श्रीमंत व गरीब नावाची दोन टोके नष्ट करून टाकू व निस्वार्थ, निस्सीम मैत्री साकारूया......