Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महालक्ष्मी : एक दृष्टिक्षेप

वेबदुनिया
स्वातंत्र्पूर्व काळात एका खेडय़ात घडलेली ही सत्य घटना. गौरी-गणपतीचे उत्साहाचे दिवस होते. गणपती आले होते आणि घरोघरी ग्रामीण स्त्रियांची गौरी आणण्याची लगबग सुरू होती. जानकीकाकूही उत्साहाने कामाला लागल्या. त्यांनी महालक्ष्मी (गौरी) साठी लाडू, करंज्या, अनारसे, चकली इत्यादी पदार्थ हौसेने बनवले होते. त्यांचे सोवळे-ओवळे ही फारच कडक होते. महालक्ष्मीसाठी केलेल्या फराळाचे पदार्थ महालक्ष्मी सण पार पडल्याशिवाय कोणीही खायचे नाही, असा त्यांचा दंडकच होता. विशेष म्हणजे तंच आज्ञाबाहेर जाण्याची घरात कुणाची प्राज्ञा नव्हती.

झाले! जानकीकाकूंनी गौरी आणल्या. त्याकाळात खेडय़ातील पद्धतीप्रमाणे कणगीमध्ये सगळेच लाडू-करंज्या इत्यादी पदार्थ भरून टाकले आणि त्या कणगीवर गौरीही बसवल्या. गौरींना सुंदर साडय़ा घालून दागिने घातले. सारे काही मनासारखे झालच्याचे समाधानाने त्यांनी सुस्कारा सोडला. त्याकाळी जानकीकाकूंना चांगली सहा-सात मुले-मुली होती. ती सर्व ‘लाडू खायला दे’ असा सारखा हट्ट करत होती. पण या बाईचे मन काही द्रवले नाही. शिवाय गौरीने खाण्याच्या (?) आधी मुलांनी लाडू खाल्ले तर ती रागावेल, आणि घरात काहीतरी वाईट होईल ही अज्ञानमूलक भीती होतीच.

WD
सारे काही झाल्यावर जानकी काकू शेजारी-पाजारी हळदी-कुंकवासाठी गेल्या. आई घराबाहेर पडायची मुले वाटच बघत असावीत. मुलांनी कणगीवरील लक्ष्मीचा मुखवटा बाजूला काढला आणि भराभर कणगीतील लाडू-करंज्या काढून घेतल्या. तेवढय़ात ‘आई आली’ कोणीतरी एकाने सांगितले. मुलांची धांदल उडाली. त्यांनी गडबडीने लक्ष्मीचा मुखवटा कणगीवर ठेवला तो पलीकडे तोंड करून. आणि मुले पसारही झाली.

इकडे काकू आत य ऊन पाहतात तो लक्ष्मीने तोंड फिरवलेले. ते पाहून त्या घाबरून बेशुद्धच पडल्या. शेजारी-पाजारी जमा झाले. मुलांना हे कळताच मुले घरात येऊन रडू लागली. आई, उठ आम्हीच लाडू घेऊन मुखवटा ठेवला, असे म्हटलवर थोडय़ा वेळाने काकू एकदाच शुद्धीवर आल्या. पण आजही आपण शुध्दीवर आलोत का? याचा विचार करावा लागेल.

ही घटना ग्रामीण भागात जुन्या काळात घडली असली तरी आजही ग्रामीण आणि शहरी भागातही असंख्य स्त्रिया महालक्ष्मीचा सण म्हणजे फार कडक, थोडे काही चुकले तर आपले वाईट होईल, या भीतीपोटी वागत असतात. लहान ङ्कुलांनाही लाडू न देणारी जानकीकाकू आणि आजच्या स्त्रियांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.

WD
वास्तविक महालक्ष्मी, चैत्रातली वसंतगौर ही स्त्रीचीच रूपे आहेत. या गौरींसाठी केलेले गोड-धोड पदार्थ आधी घरातील मुलांना तर द्यालाच हवेत किंवा थोडे बाजूला काढून तरी ठेवालाच हवेत. घरातल्या मुला-बाळांना नाराज करून कसली देवी प्रसन्न होणार आहे? महाहालक्ष्मी ही स्त्रियांचेच प्रतीक आणि शेवटी ती एक मूर्तीपूजा आहे. मूर्तीपूजेला किती भ्यायचे? मूर्ती हे प्रतीक आहे, हे मान्य केले तरी प्रतिकाच्या किती आहारी जाचे याचा विचार आजच्या स्त्रियांनी केलाच पाहिजे. जानकीकाकूंनी केल्या तशा अनेक चुका इतरही स्त्रियांकडून महालक्ष्मीच्या सणाच्यावेळी घडतात. मन निर्मळ असेल, सगळ्यांना वेळेवर खायला-प्यायला देऊन समाधानाने गौरीचा सण केला तर तो खूपच आनंद देणारा सण ठरेल.

स्त्रियांमध्ये भक्तिभावना तीव्र असते. त्यातच भर म्हणून दुर्दैवाने काही घरातले पुरुषही महालक्ष्मीबाबत काही वेगळे करायचे म्हटले तर ‘काही वेडे-वाकडे घडले तर काय कराचे’ असे बोलत असतात. तेव्हा महालक्ष्मीची भीती न बाळगता आनंदाने, सर्वाना विशेषत: लहान मुले, घरातील वृद्ध यांना खायला-प्यायला घालून सण साजरा करा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सूक्षम फरक ओळखाला शिका. देवता जशा सगुण साकार आहेत तशा त्या निगरुण निराकारही आहेत, हा मुद्दा येथे महत्त्वाचा वाटतो.

सुनिता कुलकर्णी

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

सर्व पहा

नक्की वाचा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments