Marathi Biodata Maker

GaneshTemples : चिंतामणी गणपतीची आहे हे सिद्ध मंदिरे, भेट दिल्यास इच्छा पूर्ण होते

Webdunia
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (22:54 IST)
देशातील सर्व गणेश मंदिरांपैकी फक्त चार मंदिरेच परिपूर्ण मानली जातात आणि त्यांना चिंतामण किंवा चिंतामणी गणेश मंदिर म्हटलेआहे. असे मानले जाते की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी या मंदिरांना भेट दिली पाहिजे. या मंदिरांमध्ये चिंतामण सिद्ध भगवान गणेशाच्या चार स्वयंभू मूर्ती आहेत. येथे असलेल्या विघ्नहर्ताच्या केवळ दर्शनाने लोकांच्या अनेक मनोकामना पूर्ण होतात आणि आलेली सर्व विघ्ने टाळतात. चार चिंतामण मंदिरांमध्ये रणथंबोर सवाई माधोपूर त्रिनेत्र गणपती (राजस्थान), उगौन मधील अवंतिका, गुजरातमधील सिद्धपूर आणि सिहोर येथील चिंतामण गणेश मंदिर यांचा समावेश आहे. 
 
विशेष म्हणजे या चारही मंदिरांची स्वतःची आख्यायिका असून गणेश चतुर्थीच्या दिवशी चारही मंदिरांवर भव्य जत्रा भरवली जाते. यातील एक मंदिर भगवान श्री राम यांनी बांधले आणि दुसरे राजा विक्रमादित्य यांनी बांधले. चला तर मग जाणून घेऊया या मंदिरांच्या दंतकथा

* चिंतामण गणेश सिहोर- 
भोपाळपासून 2 किमी अंतरावर असलेल्या सिहोर येथील चिंतामण गणेश मंदिर राजा विक्रमादित्यने बांधले होते. या मंदिरात बसवलेली मूर्ती खुद्द राजाला गणेशाने  देऊन मंदिर बांधण्यास सांगितले होते. पौराणिक कथेनुसार, एकदा राजाला स्वप्नात गणपती ने दृष्टांत दिले आणि त्याने पार्वती नदीच्या काठावर आपली मूर्ती फुलांच्या रूपात ठेवण्याचे संकेत दिले आणि मंदिरात स्थापित करण्यास सांगितले. जेव्हा राजा विक्रमादित्यला ते फूल पार्वती नदीच्या काठी सापडले, राजा परत येताना वाटेत अंधार झाला आणि त्याने ते फूल तिथेच ठेवून विश्रांती घेऊ लागले  आणि मग त्या फुलाचे रूपांतर गणपतीच्या मूर्तीत झाले आणि ते जमिनीत गाडले गेले. अंगरक्षकांनी रथाला साखळदंडाने बांधून मूर्ती जमिनीतून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र मूर्ती बाहेर आली नाही. त्यानंतर विक्रमादित्याने तेथे गणपतीची मूर्ती बसवून हे मंदिर बांधले.
 
येथील मूर्तीचे डोळे हिऱ्यांचे होते, मंदिरात बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीचे डोळे
एकेकाळी हिऱ्यांचे होते, मात्र चोरीनंतर चांदीचे डोळे देवाला बसवण्यात आले आहेत. हिऱ्याचा डोळा चोरीला गेल्यावर डोळ्यातून दुधाचा धारा वाहू लागल्याचे सांगितले जाते. 
 
इथे दर महिन्याला गणेश चतुर्थीला भंडारा भरतो. प्लेगच्या प्रादुर्भावामुळे येथील लोकांनी साखळे घातले आणि नवस केले. आणि प्लेग संपल्यावर दर महिन्याच्या गणेश चतुर्थीला भंडारा सुरू झाला.
 
* अवंतिका गणपती उगौन- येथे येणारे भाविक मंदिराच्या मागील बाजूस उलटे स्वस्तिक करून नवस करतात आणि पूर्ण झाल्यानंतर पुन्हा येऊन सरळ स्वस्तिक बनवतात .
 
* चिंतामणी गणेश उज्जैन-
त्रेतायुग चिंतामण मंदिराची स्थापना भगवान रामाने केली होती. वनवासात सीताजींना एकदा तहान लागली, तेव्हा प्रथमच लक्ष्मणजींनी रामाची आज्ञा मोडून पाणी आणण्यास नकार दिला. तेथील वारे दोषपूर्ण आहेत हे रामाला त्यांच्या दिव्य दृष्टीतून कळले आणि त्यावर मात करण्यासाठी गणपतीचे हे चिंतामण मंदिर बांधले. लक्ष्मणाने नंतर मंदिराशेजारी एक तलाव बांधला, जो आजही लक्ष्मण बावडी म्हणून ओळखला जातो, असे म्हणतात. या मंदिरात तीन गणपतीच्या मूर्ती एकत्र बसवल्या आहेत.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Margashirsha Guruvar 2025 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा

घरात अश्या प्रकारे कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती मिळेल

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी या वस्तूंचे दान करणे करिअरसाठी शुभ

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments