Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीन राज्यांत अंतिम टप्प्यात मतदान सुरु

Webdunia
सोमवार, 12 मे 2014 (10:32 IST)
16 लोकसभा निवडणुकीच्या अंतिम अर्थात नवव्या टप्प्यात आज (सोमवार) 41 जागांवर मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाली असून  यात वाराणसीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपचे नरेंद्र मोदी, 'आप'चे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय यांच्यांत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वाराणसीत विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे.

नवव्या टप्प्यात बिहारमध्ये 6 जागांसाठी 90 उमेदवार, उत्तर प्रदेशात 18 जागांसाठी 328 उमेदवार रिंगणात आहेत. जगदंबिका पाल, केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, माफिया डॉन मुख्तार अन्सारी, कलराज मिश्र, योगी आदित्यनाथ, रविकिशन, नीरज शेखर आदी दिग्गजांचे भाग्य मतदार इव्हीएममध्ये बंद करणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये 17 जागांसाठी 188 उमेदवार रिंगणात आहेत. यात केंद्रीय मंत्री अधीररंजन चौधरी, तपन सिकदर, सुदीप बंडोपाध्याय, सौगत रॉय, दिनेश त्रिवेदी, तापस पाल, दीपक अधिकारी (देव), अभिषेक बॅनर्जी, सुभाषिनी अली, जादूगर पीसी सरकार ज्यु आदींचा समावेश आहे.

रघुवंश प्रसाद सिंह, चित्रपट दिग्दर्शक-निर्माते प्रकाश झा हे नशीब आजमावरत आहेत. एकूण नऊ कोटींपेक्षा अधिक मतदार 606 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करतील. यासोबतच 7 एप्रिलपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रिया 9 टप्प्यांत संपणार आहे. मतमोजणी 16 मे रोजी होईल. आठव्या टप्प्यात 402 जागांवर विक्रमी सरासरी 66 टक्के मतदान झाले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments