Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित शाह यांनी गोव्यात नेहरूंच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले

Webdunia
गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (13:46 IST)
भाजप गोव्यात पुन्हा आपले सरकार स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून पक्षाचे सर्व बडे नेते येथे पोहोचून प्रचारात व्यस्त आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील निवडणूक रॅलीला संबोधित करत म्हटले की 2022 च्या निवडणुकीत गोव्यात एका बाजूला काँग्रेस पक्ष आहे तर दुसरीकडे भाजप. कोणत्या पक्षाला पाच वर्षांचा जनादेश द्यायचा हे गोव्यातील जनतेने ठरवायचे आहे.
 
काँग्रेसची राजवट अस्थिरता आणि अराजकतेची होती असे ते यावेळी म्हणाले. भाजपने गोव्याला स्थैर्य आणि विकासाची राजवट दिली आहे तसेच गोवा हे देशातील सर्वात विकसित राज्य, सुवर्ण गोवा व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

गांधी परिवारासाठी गोवा हे पर्यटन स्थळ आहे, ते पर्यटक म्हणून येतात आणि पर्यटक म्हणून निघून जातात, असे ते बोलले.
 
गृहमंत्री अमित शहा यांनीही नेहरूंवर हल्लाबोल करत म्हटले की कॉंग्रेसने गोव्यावर नेहमीच अन्याय केला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असो की विकासासाठी, इतिहास साक्षी आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व निर्णायक ठरले असते, तर  गोव्याला देशातील इतर भागांप्रमाणेच 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले असते.

अमित शाह म्हणाले की बरेच लोक म्हणतात की गोवा हे खूप लहान राज्य आहे. मी देखील मानतो की गोवा हे खूप लहान राज्य आहे पण ज्याप्रकारे एका मुलीच्या कपाळावर बिंदी असते त्याचप्रकारे आपला गोवा भारतमातेची बिंदी आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments