suvichar

येथे गुढीपाडव्याला केलं जातं रावण वध

Webdunia
दसरा या सणाला रावण दहन करण्याची परंपरा सर्वांनाच ज्ञात आहे. परंतू उज्जैन विभागात एक गाव असे आहे जिथे हिंदू नववर्षाची सुरुवात रावण दहनासह करण्यात येते. वर्षांपासून येथे या विचित्र परंपरेचे निर्वाह केले जात आहे.
 
दरवर्षी गुढीपाडव्याला सुमारे 5 हजार लोकसंख्या असलेल्या गाव कसारी येथे राम-रावण यांच्यात युद्ध होतं. प्रभू श्रीराम यांच्याद्वारे सोडण्यात येणार्‍या अग्निबाणाने रावणाच्या पुतळ्याचे दहन होतं.
 
शक्यतो देशातील हे पहिले असे गाव आहे जिथे नवीन वर्षात रावण दहन केलं जातं. काही वर्षापूर्वी गावकरी रावणाच्या पुतळ्याला दगड आणि काठीने वार करून वध करायचे परंतू काळ बदलला आणि मारण्याची रीतीदेखील. आता फटाके फोडत रावणाचं दहन केलं जातं.
 
गावकर्‍यांप्रमाणे रावण दहनापूर्वी अमावास्येला रात्री तलावाकाठी रामलीला मंचन केलं जातं नंतर गुढीपाडव्याला सकाळी अकरा वाजता रावण वधासाठी राम आणि रावणाची सेना युद्ध करत त्या ठिकाणी पोहचते आणि रामद्वारे रावणाच्या नाभीवर अग्निबाणाने प्रहार केला जातो.
 
कसारी गावात अशी विचित्र परंपरा आहे. आतिषबाजी झाल्यावर गावकरी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि कडुलिंबाची पाने प्रसाद रूपात वाटतात. येथील ही परंपरा 50 वर्षांपेक्षाही जुनी आहे. तसेच या परंपरेला स्पष्ट मान्यता किंवा दंतकथा प्रचलित नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Basaveshwar Jayanti 2026 महात्मा बसवेश्वर: ८०० वर्षांपूर्वी 'लोकशाही' मांडणारा क्रांतीसुर्य!

Vinayak Chaturthi 2026 विनायक चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

नमश्शिवाय भुजंगम् Namashivaya Bhujangam

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments