Dharma Sangrah

येथे गुढीपाडव्याला केलं जातं रावण वध

Webdunia
दसरा या सणाला रावण दहन करण्याची परंपरा सर्वांनाच ज्ञात आहे. परंतू उज्जैन विभागात एक गाव असे आहे जिथे हिंदू नववर्षाची सुरुवात रावण दहनासह करण्यात येते. वर्षांपासून येथे या विचित्र परंपरेचे निर्वाह केले जात आहे.
 
दरवर्षी गुढीपाडव्याला सुमारे 5 हजार लोकसंख्या असलेल्या गाव कसारी येथे राम-रावण यांच्यात युद्ध होतं. प्रभू श्रीराम यांच्याद्वारे सोडण्यात येणार्‍या अग्निबाणाने रावणाच्या पुतळ्याचे दहन होतं.
 
शक्यतो देशातील हे पहिले असे गाव आहे जिथे नवीन वर्षात रावण दहन केलं जातं. काही वर्षापूर्वी गावकरी रावणाच्या पुतळ्याला दगड आणि काठीने वार करून वध करायचे परंतू काळ बदलला आणि मारण्याची रीतीदेखील. आता फटाके फोडत रावणाचं दहन केलं जातं.
 
गावकर्‍यांप्रमाणे रावण दहनापूर्वी अमावास्येला रात्री तलावाकाठी रामलीला मंचन केलं जातं नंतर गुढीपाडव्याला सकाळी अकरा वाजता रावण वधासाठी राम आणि रावणाची सेना युद्ध करत त्या ठिकाणी पोहचते आणि रामद्वारे रावणाच्या नाभीवर अग्निबाणाने प्रहार केला जातो.
 
कसारी गावात अशी विचित्र परंपरा आहे. आतिषबाजी झाल्यावर गावकरी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि कडुलिंबाची पाने प्रसाद रूपात वाटतात. येथील ही परंपरा 50 वर्षांपेक्षाही जुनी आहे. तसेच या परंपरेला स्पष्ट मान्यता किंवा दंतकथा प्रचलित नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

महाशिवरात्री २०२६: महादेवाच्या पिंडीची पूजा फलदायी की शंकराच्या मूर्तीची? जाणून घ्या शास्त्र काय सांगते!

Mahashivratri 2026 Muhurat महाशिवरात्रीला ग्रहण योग: या वेळी पूजा करणे टाळा; शुभ मुहूर्त जाणून घ्या

Mahashivratri 2026: शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर मंदिरातून रिकामा तांब्या का आणू नये?

विनाशातून सृजनाकडे: महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय?

Mahashivratri Vrat During Periods मासिक पाळीच्या काळात महाशिवरात्रीचा उपवास करू शकतो का?

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

पुढील लेख
Show comments