Festival Posters

ज्ञानाचा मार्ग आहे गुरु पौर्णिमा

Webdunia
शुक्रवार, 23 जुलै 2021 (07:16 IST)
धर्मग्रंथात, गुरूचा अर्थ अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे असे सांगितले आहे. गुरू तोच आहे जो आपल्याला अंधारापासून प्रकाशाकडे नेतो. गुरूच्या भक्तीसाठी अनेक श्लोकांची रचना केली गेली आहे जी गुरूचे महत्व व्यक्त करण्यात मदत करतात. देवाची प्राप्ती ही गुरुच्या कृपेने शक्य आहे आणि गुरुच्या कृपेशिवाय काहीही शक्य नाही.
 
भारतात गुरु पौर्णिमेचा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा आपल्यातील गुरुचे महत्त्व प्रतिबिंबित करते. पूर्वी विद्यार्थी आश्रमात राहत असत आणि गुरूंकडून शिक्षण घेत असत आणि गुरुसमक्ष आपलं सर्व बलिदान देण्याची भावना त्यांच्यात होती, तेव्हाच तर एकलव्यासारख्या शिष्याचे उदाहरण गुरूबद्दल आदर आणि खोल श्रद्धेचे प्रतीक बनले, ज्याने आपला अंगठा गुरुला देण्यास क्षणभर देखील विचार केला नव्हता.
 
गुरु पौर्णिमा चंद्राप्रमाणे तेजस्वी आणि प्रकाशमान आहेत, त्याच्या वैभवाच्या समोर देव देखील नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. गुरु पौर्णिमेचे स्वरुप बनून आषाढ रुपी शिष्याचा अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करतो. शिष्य काळ्या ढगांनी वेढलेला असतो, ज्यामध्ये पौर्णिमेचा गुरु प्रकाश पसरविण्याचं काम करतं. ज्याप्रमाणे आषाढ हा काळ ढगांनी वेढलेला असतो त्याचप्रमाणे गुरुच्या ज्ञानाच्या किरणांच्या तेजाने, ज्ञानाने परिपूर्ण अर्थाने आगमन होते.
 
गुरु आत्मा -
 
गुरु हा परमात्म्याशी संबंध साधणारा माध्यम असतो. गुरूशी संपर्क साधल्यावरच जीव आपली जिज्ञासा समाप्त करण्यास सक्षम होतं त्याला परमेश्वराचा साक्षात्कार होतो. आम्ही तर साध्य आहोत परंतु गुरू ती शक्ती आहे, जी आपल्यातली भक्तीची भावना अलौकिक रूप धारण करून त्यातील सामर्थ्याचा संप्रेषण करण्याचा अर्थ आपल्याला अनुभववते आणि भगवंताशी आपले एकत्रीकरण शक्य होते. गुरूद्वारे परमात्माची भेट शक्य होते. 
 
म्हणूनच असे म्हटले जाते- 
'गुरु गोविंददोऊ खड़े, काके लागूं पाय।
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय।।
 
गुरु पौर्णिमेचे महत्व: -
गुरूंना ब्रह्मा म्हणतात. गुरु त्याच्या शिष्याला नवीन जन्म देतो. गुरु साक्षात महादेव आहे, कारण तो आपल्या शिष्यांचे सर्व दोष क्षमा करतो. गुरुचे महत्त्व सर्व बाबतीत अर्थपूर्ण आहे. आध्यात्मिक शांती, धार्मिक ज्ञान आणि सांसारिक जीवनासाठी गुरूंचे मार्गदर्शन फार महत्वाचे आहे. गुरू केवळ शिक्षकच नसतात, तर व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक संकटापासून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करणारे ते एक मार्गदर्शक देखील आहेत.
 
गुरु एखाद्या व्यक्तीस अंधारापासून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करते, सोप्या शब्दांत, गुरु ज्ञान प्रदान करणारा असतो. आजही या वस्तुस्थितीचे महत्त्व कमी नाही. आजही शाळा आणि शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांद्वारे या दिवशी गुरूचा सन्मान केला जातो. मंदिरात पूजेचे आयोजन, पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते, वेगवेगळ्या ठिकाणी भंडारा आणि मेळ्याचे आयोजन केले जाते.
 
खरं तर, ज्यांच्याकडून आपण काहीही शिकतो, तो आपला गुरु बनतो आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा म्हणजे 'गुरु पूर्णिमा' किंवा 'व्यास पूर्णिमा'. लोक त्यांच्या गुरूचा आदर करतात, त्याला पुष्पहार घालतात आणि गुरुला फळ, कपडे इत्यादी अर्पण करतात. पौराणिक काळापासून चालू असलेला हा गुरुपूजनाचा दिवस आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

चैत्र नवरात्री 2026: कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी?

चैत्र नवरात्री 2026 घटस्थापना, अष्टमी-नवमी आणि रामनवमी कधी?

बुधवारी करा गणपतीची ही खास पूजा; सर्व अडथळे दूर होतील

गुढी पाडवा २०२६: घर सजावट आयडिया, गुढी उभारणे आणि नवीन वर्षाचे संकल्प

Gudi Padwa 2026 गुढी पाडवा २०२६ तारीख, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि साजरे करण्याची पद्धत

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

पुढील लेख
Show comments