Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुध अष्टमी व्रत कथा आणि महत्व

Webdunia
बुधवार, 20 जानेवारी 2021 (06:56 IST)
अनेक ठिकाणी बुध अष्टमीच्या महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी श्री विष्णू भगवान आणि श्री गणेशाची पूजा करण्याचे देखील विधान आहे. 
 
या दिवशी घर स्वच्छ आणि पवित्र ठेवावे आणि इष्ट देवाची पूजा करावी. शास्त्रांप्रमाणे बुध अष्टमीच्या दिवशी देवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मकता आणि शुभता येते.
 
बुधाष्टमी कथा वैवस्वत मनु याशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. यानुसार मनुचे दहा पुत्र आणि एक पुत्री इला होती. इला नंतर पुरुष झाली होती. इलाच्या पुरुष होण्यामागील कहाणी या प्रकारे आहे की मनु यांनी पुत्र कामना करत मित्रावरुण नावाचं यज्ञ केलं. त्या प्रभावाने त्यांना पुत्री प्राप्ती झाली. कन्येचं नाव इला असे ठेवले गेले.
 
इला हिला मित्रावरुण यांनी आपल्या कुळाची कन्या आणि मनुचा पुत्र होण्याचे वर दिले होते. एकदा राजा इल शिकार करत असताना अशा ठिकाणी जाऊन पोहचले जेथे महादेव-पावर्तीचे वरदान होते की या स्थानी प्रवेश करणारा स्त्री रुप धारण करेल. त्या प्रभावाने इलने प्रवेश केल्यावर तो स्त्री रुपात परिवर्तित झाला. 
 
इलाचे सौंदर्य बघून बुध प्रभावित झाले आणि त्यांनी इलाशी विवाह केला. इला आणि बुध यांचा विवाह सोहळाच्या रुपात बुधाष्टमी साजरी करण्याची परंपरा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

हनुमान जयंती विशेष नैवेद्य Besan Laddu Recipe

महाराष्ट्रातील ८ प्रसिद्ध हनुमान मंदिरे

आरती शुक्रवारची

Damnak Chaturdashi 2025 दमनक चतुर्दशी कधी आणि का साजरी केली जाते

केसरी नंदन हनुमानजींसाठी नैवेद्यात बनवा केशरी खीर

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments