Dharma Sangrah

महाशिवरात्रीच्या नंतर पडणारी अवस का आहे खास जाणून घेऊ या....

Webdunia
रविवार, 23 फेब्रुवारी 2020 (09:51 IST)
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्व आहे. हिंदू धर्मात हा एक मोठा सण आहे. या दिवशी शिव आणि शक्तीचा विवाह सोहळा असतो. शिवरात्रीच्या नंतर लगेच अवस येते. 
 
हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षाची तिथी अवसेची तिथी असते. आख्यायिका अशी आहे की या तिथीचे आराध्य देव पितृदेव आहे. ते प्रसन्न झाले तर सर्व आत्मा तृप्त होतात. 
 
ज्योतिषींच्या मतेनुसार या दिवशी सूर्य आणि चंद्रमा एकाच राशीत येतात. या दिवशी कृष्ण पक्षात दैत्य आणि शुक्ल पक्षात देव सक्रिय असतात. अवसेच्या तिथीला पितरांना प्रसन्न करावे अशी समज आहे. 
 
या अवसेला पितरांना तर्पण दिले जाते. या तिथीला पितरांच्या मोक्षाची तिथी म्हटली जाते. असे म्हणतात की ज्यांना पितरांना तर्पण करता येत नाही त्यासाठी काही अवस सांगितल्या आहे ज्याला तर्पण करून मोक्ष देऊ शकतो. त्या श्राद्धतिथी म्हणून म्हटल्या जातात. महाशिवरात्रीच्या नंतरची अवस त्यापैकी एक आहे.
 
या दिवशी श्राद्ध कर्मच नाही तर काळसर्पदोषाचे निवारण पण केले जाते. श्राध्दपक्षात ज्या दिवशी ज्या तिथीला व्यक्ती दिवंगत होते त्याच दिवशी त्याचे कार्य केले जाते. पण कधी कधी तिथी माहित नसल्यामुळे या अवसेला तिथी मानून त्याचे कार्य करता येते. काही ठिकाणी या दिवशी जत्रा भरते. या दिवशी गंगेत स्नान करणे देखील लाभदायी मानले गेले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुरुवारी साई चालीसा पाठ करा, बाबांचा आशीर्वाद मिळवा

आरती गुरुवारची

करिदिन संपूर्ण माहिती

शिवपुराणानुसार भगवान शिवाने मृत्यूची ही ८ लक्षणे सांगतिली आहेत

Mauni Amavasya 2026 मौनी अमावस्येला दुर्मिळ योगायोग: पितृदोषापासून मुक्तीसाठी सर्वात खास उपाय

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments