Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगन्नाथ यात्रेबद्दल 10 तथ्य, प्रत्येक भक्ताला माहीत असावे

Webdunia
बुधवार, 24 जून 2020 (13:32 IST)
1 पुरीच्या रथयात्रेसाठी बलराम, श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रेसाठी तीन वेग वेगळे रथ तयार केले जाते. रथ यात्रेमध्ये सर्वात पुढे बलरामाचे रथ, मध्यभागी सुभद्रेचे रथ आणि सर्वात मागे भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचे रथ असतात. ते त्यांचा रंगाने आणि उंचीवरून ओळखलं जातं. 
 
2 बलरामाच्या रथाला 'तालध्वज' म्हणतात, ह्याचा रंग लाल आणि हिरवा असतो. देवी सुभद्राच्या रथाला 'दर्पदलन' किंवा 'पद्मरथ' म्हणतात, हे काळे किंवा निळ्या आणि लाल रंगाचे असतं, भगवान जगन्नाथाच्या रथाला 'नंदीघोष' किंवा 'गरुडध्वज' म्हणतात. ह्याचा रंग लाल आणि पिवळा असतो.
 
3 भगवान जगन्नाथाचे नंदीघोष रथ 45.6 फूट उंच, बलरामाचे तालध्वज रथ 45 फूट उंच आणि देवी सुभद्रेचे दर्पदलन रथ 44.6 फूट उंचीचे आहे. 
 
4 सर्व रथ कडुलिंबाच्या पवित्र आणि परिपक्व लाकडापासून बनवले जातात, ज्याला 'दारू' म्हणतात. या साठी कडुलिंबाच्या निरोगी आणि शुभ झाडाची ओळख केली जाते. या साठी जगन्नाथ देऊळाची एक विशेष समिती बनविण्यात येते. 
 
5 या रथांच्या निर्माणामध्ये कोणत्याही प्रकाराचे खिळे किंवा काटे किंवा इतर कुठल्याही धातूंचा वापर केला जात नाही. या रथांसाठी लागणाऱ्या लाकडांची निवड वसंत पंचमीच्या दिवसापासून केली जाते आणि रथाचे बांधकाम अक्षय तृतीयेपासून सुरू होतं.
 
6 हे तिन्ही रथ तयार झाल्यावर 'छार पाहणरा' नावाचा विधी करण्यात येतो त्या अंतर्गत पुरीचे राजा गजपती पालकीमध्ये येतात आणि तिन्ही रथांची विधिविधानाने पूजा करतात आणि 'सोन्याचा केरसुणी' ने रथ मंडप आणि मार्ग स्वच्छ केलं जातं. 
 
7 आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला रथयात्रा सुरू होते. ढोल, ताशे, रणशिंग आणि शंखांच्या आवाजात भाविक या रथाला ओढतात. असे म्हणतात की जे या रथाला ओढतात ते भाग्यवंत समजले जातात. 
 
8 जगन्नाथ देऊळापासून रथयात्रा सुरू होऊन पुरी शहरातून होत हे रथ गुंडीचा देऊळात पोहोचतात. इथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा सात दिवस विश्रांती घेतात. गुंडीच्या देऊळामध्ये भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला 'आडप- दर्शन' म्हटलं जातं. 
 
9 गुंडीच्या देऊळाला गुंडीचं बाडी देखील म्हणतात. हे देवांच्या मावशीचे घर आहे. या देऊळाच्या विषयी आख्यायिका आहे की येथेच देव शिल्पी विश्वकर्मानी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवींच्या मूर्ती तयार केल्या.
 
10 आषाढ महिन्यातील दहाव्या दिवशी सर्व रथ परत देऊळाकडे परतीचा प्रवास करतात. रथांच्या परतीच्या या प्रवासाच्या विधीला बहुडा (बहुनाथ) यात्रा असे ही म्हणतात.

संबंधित माहिती

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments