Festival Posters

गजानन महाराजांच्या तीर्थामुळे वाचले भक्ताचे प्राण

Webdunia
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (17:00 IST)
गजानन महाराजांना बंकटलाल फार मान देत असे. एके दिवशी महाराजांना घरी नेऊन बंकटलालने त्यांची पूजा करून नैवेद्य अर्पण केला. महाराजांना कशाची आसक्ती नव्हती. महाराज ''गण गण गणात बोते'' असे भजन टिचक्यांच्या तालावर तासंतास म्हणत असे.
 
एकदा जानराव देशमुख नावाचे गृहस्थ फार आजारी पडले. पुष्कळ डॉक्टर, मोठमोठले वैद्य झाले. कोणाच्या औषधाने गुण येईना. त्यांचा नातेवाईकांच्या मनात विचार आला की गजानन महाराजांचे तीर्थ आणावे. तेव्हा त्याच्या जवळची मंडळी बंकटलाल यांच्याकडे जाऊन महाराजांचे तीर्थ मागू लागली. तेव्हा बंकटलाल यांनी म्हटले की हे काम माझे वडील करु शकता.
 
तेव्हा बंकटलालच्या वडिलांनी एका भांड्यात पाणी घेतले आणि गजानन महाराजांच्या पायाला लावले. ''हे तीर्थ म्हणून देऊ का ?' 'असे महाराजांना विचारले. महाराजांनी मानेनेच होकार दिला. ते तीर्थ घेऊन त्यांचे नातेवाईक तेथून निघाले. 
 
घरी गेल्यावर जानराव देशमुखांना त्याने ते तीर्थ थोडे-थोडे पाजण्यास सुरुवात केली आणि सर्व औषधे बंद केली. तीर्थ चालू ठेवले. आश्चर्य म्हणजे थोड्याच दिवसात जानराव देशमुखांची तब्बेत सुधारली. ते गजानन महाराजांच्या पाय पडले. त्यांनी सर्व लोकांना स्वतःच्या खर्चाने जेवण घातले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गंगा सप्तमी का साजरी केली जाते? जाणून घ्या पौराणिक कथा

आरती गुरुवारची

गंगा आरती : ॐ जय गंगे माता, श्री गंगे माता

Ganga Saptami 2026 Wishes in Marathi गंगा सप्तमीच्या शुभेच्छा

Ramanuja Jayanti 2026 आज रामानुज जयंती, का साजरी केली जाते? ५ रंजक तथ्ये जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments