Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पती-पत्नीने एकाच ताटात अन्न खाऊ नये! कारण जाणून घ्या

Husband
Webdunia
मंगळवार, 5 एप्रिल 2022 (13:36 IST)
बहुतेक घरांमध्ये पती-पत्नी एकाच ताटात जेवण जेवतात. ताटात जेवण केल्याने परस्पर प्रेम वाढते, असा त्यांचा विश्वास असतो. तथापि, पती-पत्नीने ताटात अन्न खाऊ नये, असे धर्मग्रंथांत सांगण्यात आले आहे. पण, असं का म्हटलं जातं, या विषयाबद्दल लोकांना अनेकदा माहिती नसते. महाभारतातही त्याचा उल्लेख आला असला तरी. चला जाणून घेऊया पती-पत्नीने ताटात का जेवू नये. 
 
पती-पत्नीने एकाच ताटात अन्न खाऊ नये
एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढते हे नाकारता येणार नाही. भीष्म पितामह यांनाही हे चांगलेच समजले होते. प्रत्येक माणसाची कुटुंबाप्रती अनेक कर्तव्ये आहेत, असा त्यांचा विश्वास होता. अशा परिस्थितीत जर ती कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडायची असतील आणि कुटुंबात सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे असतील तर पती-पत्नीने एकाच ताटात जेवण करू नये. खरे तर पत्नीसोबत ताटात जेवण केल्याने कुटुंबातील इतर नातेसंबंधांच्या तुलनेत पत्नीचे प्रेम नवऱ्यासाठी सर्वोपरि होते. अशा स्थितीत व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरतो. जर पतीचे पत्नीवरील प्रेम सर्वोपरि झाले तर कुटुंबात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पत्नीसोबत ताटात जेवण करू नये. 
 
कुटुंबाने एकत्र बसून जेवायला हवे
कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करावे, अशी भीष्म पितामहांची धारणा होती. यामुळे कुटुंबात परस्पर प्रेम वाढते. यासोबतच एकमेकांप्रती त्याग आणि समर्पणाची भावनाही प्रबळ असते. त्यामुळे कुटुंबाची प्रगती होते. 
 
असे अन्न खाऊ नये
भीष्म पितामहांचा असा विश्वास होता की जर कोणी जेवणाचे ताट ओलांडले तर ते दूषित होते. ते जनावरांना खायला द्यावे. याशिवाय जर कोणी अन्नाच्या ताटावर पाय मारला तर असे अन्न हात जोडून टाकून द्यावे. खरे तर असे अन्न गरिबी आणते.
 
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया  याची पुष्टी करत नाही.)

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

गणपती आरती संग्रह भाग 1

Akshaya Tritiya 2025 अक्षय तृतीया विशेष नैवेद्य थाळी

Tukdoji Maharaj Jayanti राष्ट्र संत तुकडोजी महाराज मंदिर अमरावती

Akshaya Tritiya 2025 अक्षय्य तृतीयेला या 6 वस्तू घरी आणू नका, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments