Dharma Sangrah

तीर्थक्षेत्र जेजुरी

Webdunia
बुधवार, 8 डिसेंबर 2021 (16:16 IST)
जेजुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे. हे खंडोबाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. याला 'खंडोबाची जेजुरी' म्हणून ओळखतात. हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२) देऊळ आहे.
 
खंडोबाचे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे जिथे जाण्यासाठी सुमारे दोनशे पायऱ्या चढून जावे लागते. डोंगरावरून संपूर्ण जेजुरीचे सुंदर दर्शन घडते. चढताना मंदिराच्या प्रांगणात वसलेल्या दीपमाळेचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. जेजुरी हे प्राचीन दीपमाळांसाठी खूप प्रसिद्ध आहे. खंडोबावर मल्ल आणि मणी यांच्यावर झालेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी सहा दिवसांची जत्रा भरते. याचे आयोजन मार्गशीर्ष या हिंदू महिन्यात केले जाते. जत्रेच्या शेवटच्या दिवसाला चंपा षष्ठी म्हणतात आणि या दिवशी उपवास केला जातो.
 
खंडोबा मंदिराची वास्तू
 
मंदिर मुख्यत्वे दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागाला मंडप म्हणतात जेथे भक्त एकत्र येतात आणि पूजा, भजन इत्यादींमध्ये भाग घेतात तर दुसरा भाग गर्भगृह आहे जेथे खंडोबाची मोहक मूर्ती आहे. हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या या मंदिरात 10x12 फूट आकाराचे पितळी कासवही आहे. मंदिरात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची अनेक शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. दसऱ्याच्या दिवशी जास्त वेळ तलवार उचलण्याची स्पर्धाही खूप प्रसिद्ध आहे. येथील मुख्य देवता खंडोबा आहे. त्याला मार्तंड भैरव आणि मल्हारी सारख्या इतर नावांनी देखील ओळखले जाते, जे भगवान शिवाचे दुसरे रूप आहे. आदराचे नाव म्हणून "बा", "राव" किंवा "राया" नंतर जोडण्यात येतं. त्यामुळे खंडोबाला खंडेराया किंवा खंडेराव असेही म्हणतात.
 
या शहराला खंडोबाची जेजुरी असेही म्हणतात. खंडोबाची मूर्ती अनेकदा घोड्यावर स्वार झालेल्या योद्ध्याच्या रूपात असते. राक्षसांना मारण्यासाठी त्याच्या हातात एक मोठी तलवार (खडग) आहे. खड्ग या शब्दावरून खंडोबा हे नावही पडले आहे. काही लोक खंडोबाला शिव, भैरव, सूर्यदेव आणि कार्तिकेय यांचे एकत्रीकरण मानतात.
 
इतिहास
 
खंडोबाचा उल्लेख मल्हारी महात्म्य आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकगीते आणि साहित्यकृतींमध्ये आढळतो. ब्रह्मांड पुराणात असे नमूद केले आहे की मल्ल आणि मणि या दोन राक्षस भावांना ब्रह्मदेवाच्या वरदानाने संरक्षण मिळाले होते. या संरक्षणामुळे ते स्वतःला अजिंक्य समजू लागले आणि पृथ्वीवरील संतांना आणि लोकांना घाबरवू लागले. त्यानंतर भगवान शंकर खंडोबाच्या रूपात आपल्या बैल नंदीवर स्वार झाले. जगाला दिलासा देण्यासाठी त्यांनी राक्षसांना मारण्याचे काम हाती घेतले. मणीने त्याला घोडा दिला आणि मानवजातीच्या कल्याणासाठी देवाकडे वरदान मागितले. खंडोबाने आनंदाने हे वरदान दिले. दुसरा राक्षस, मल्ल, मानवजातीचा नाश करण्यास सांगितले. मग देवाने त्याचे डोके कापून त्याला मंदिराच्या पायरीवर सोडले जेणेकरून मंदिरात प्रवेश करताना त्याला भक्ताने चिरडले जावे.
 
उत्सव
 
खंडोबाच्या पूजेसाठी कठोर नियम आहेत. हळद, फुले आणि शाकाहारी भोजनासोबतच नेहमीच्या पूजेप्रमाणे काही वेळा मंदिराबाहेर बकरीचे मांसही अर्पण केले जाते. भक्तांच्या मते खंडोबा अपत्य जन्म आणि विवाहातील अडथळे दूर करतो. मल्ल आणि मणी यांच्यावरील विजयाच्या स्मरणार्थ जेजुरी येथे दरवर्षी सहा दिवसांची जत्रा भरते. हा मेळा मार्गशीर्ष या हिंदू महिन्यात साजरा केला जातो. शेवटच्या दिवसाला चंपा षष्ठी म्हणतात आणि या दिवशी उपवास केला जातो. रविवार आणि पौर्णिमा हे दिवस पूजेसाठी शुभ मानले जातात.
 
नऊ लाख पायरी
अनेक लोकगीतांतून खंडेरायाचे महात्म्य सांगताना असे म्हटलं जातं- 
देवा तुझी सोन्याची जेजुरी । गडाला नऊ लाख पायरी।।
 
भंडारा
खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण “सदानंदाचा येळकोट’ किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात. नंतर दिवटी-बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.
 
खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व आहे. त्यातील काही सौम्य नवस असे- मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. दीपमाळा बांधणे. मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे. पायर्‍या बांधणे, ओवरी बांधणे. देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठरावीक दिवशी देवदर्शनास जाणे. पाण्याच्या कावडी घालणे. उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या-मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे, यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे. तळी भरणे, उचलणे, दही-भाताची पूजा देवास बांधणे. पुरण-वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांना भोजन घालणे. कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे-भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.
 
श्री खंडोबारायाची पाच प्रतीके 
लिंग
तांदळा
मुखवटे
मूर्ती
टाक

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Parshuram Jayanti 2026 Wishes in Marathi परशुराम जयंतीच्या शुभेच्छा

Basaveshwar Jayanti 2026 महात्मा बसवेश्वर: ८०० वर्षांपूर्वी 'लोकशाही' मांडणारा क्रांतीसुर्य!

Vinayak Chaturthi 2026 विनायक चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

नमश्शिवाय भुजंगम् Namashivaya Bhujangam

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख