Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kharmas2022: खरमास काळ काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 14 डिसेंबर 2022 (16:09 IST)
खरमास 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे, जो एका महिन्यानंतर 14 जानेवारीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी संपतो. ज्योतिषशास्त्रानुसार 16 डिसेंबरला सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करत आहे, यासोबतच खरमास सुरू होईल आणि 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करताच खरमास संपेल. या काळात विवाह, मुंडन विधी इत्यादी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करणे शास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते.बृहस्पति हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. या राशींमध्ये सूर्य आल्यावर खरमास दोष लागतो.
 
पौराणिक कथेनुसार एकदा सूर्यदेव सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन विश्वाची परिक्रमा करत होते. तेव्हा त्यांच्या  रथाला लावलेले घोडे सतत चालल्यामुळे खूप थकले आणि सर्व घोडे तहानेने व्याकूळ झाले. घोड्यांची ही अवस्था पाहून सूर्यदेव फार दुःखी झाले आणि काळजी करू लागले. वाटेत त्याला एक तलाव दिसला ज्याजवळ दोन खार म्हणजे गाढवे उभी होती. भगवान सूर्यनारायणाने आपल्या तहानलेल्या घोड्यांना आराम देण्यासाठी दोन गाढवांना रथावर बांधले. पण खरांचा वेगही मंदावल्याने रथाचा वेग मंदावला. तरीही कसेबसे एक महिन्याचे आवर्तन पूर्ण झाले. तोपर्यंत घोड्यांना बरीच विश्रांती मिळाली होती. अशा प्रकारे हा क्रम सुरूच राहतो. त्यामुळे या महिन्याचे नाव खरमास ठेवण्यात आले. अशा रीतीने पौष महिन्यात खर मंद गतीने चालतात आणि या महिन्यात सूर्याची तीव्रता खूपच कमी होते. पौषाच्या संपूर्ण महिन्यात सूर्याचा प्रभाव पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात कमजोर होतो. सनातन धर्मात सूर्य हा महत्त्वाचा कारक मानला जात असल्याने सूर्याची कमकुवत स्थिती अशुभ मानली जाते, त्यामुळे खरमासात कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यावर बंदी आहे.
 
काय करू नये
लग्न, जावळ, कान टोचणे, gruh प्रवेश  यासारखी सर्व शुभ कार्ये खरमासात होत नाहीत.
या काळात कोणतेही नवीन काम, व्यवसाय इत्यादी सुरू करू नये. असे केल्याने व्यवसायात यश मिळत नाही आणि धनहानी देखील होऊ शकते असे मानले जाते.
या महिन्यामुळे माणसाने लसूण, कांदा, मासे, अंडी आणि मांस-अल्कोहोल इत्यादि अन्नापासून दूर राहून शुद्ध शाकाहारी अन्न खावे.
 
खरमासात काय करावे -
खरमासात दान धर्म करावे असं केल्याने पुण्य प्राप्त होते. या महिन्यात मनात कोणतीही इच्छा न बाळगता व्रत उपासना केल्याने  चांगले फळ मिळते. या काळात गरजूंची सेवा करावी, दान करावे, साधू संतांची सेवा करावी. 
या काळात नवीन वस्त्र, दागिने, घर, वाहन दैनंदिनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकता. परंतु त्यांचा उपभोग करता येणार नाही. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments