Festival Posters

Divine Cow गायीची उत्पत्ती कशी झाली

Webdunia
हिंदू धर्मग्रंथानुसार गायींमध्ये 33 कोटी देवी-देवता वास करतात. गायीला आपल्या धर्मात खूप महत्त्वाचं स्थान आहे.
 
शतपथ ब्राह्मण ग्रंथात गाईच्या उत्पत्तीची कथा या प्रकारे सांगितली आहे. दक्ष प्रजापतीने प्राणी सृष्टी निर्माण केल्यानंतर थोडे अमृत प्राशन केले. त्या अमृताने ते संतुष्ट झाले. त्यावेळी त्यांच्या नाकातून बाहेर पडत असलेल्या श्‍वासाचा सुगंध सर्वत्र दरवळला. त्या श्‍वासातून एक गाय जन्मास आली. दक्ष प्रजापतीने सुंगधातून जन्मल्यामुळे तिचे नाव सुरभी असे ठेवले. सुरभीपासून अनेक गायी जन्मास आल्या. त्यामुळे सुरभी ही संपूर्ण गोवंशाची माता अर्थात जननी ठरली.
 
सुरभीने एकदा तप आरंभ केला आणि ब्रह्मदेव त्या तपाने प्रसन्न झाला. त्याने सुरभीला अमरत्व प्रदान केले तसेच त्रैलोक्याच्या वर असलेला एक स्वर्गही बहाल केले जे स्वर्ग गोलोक या नावाने ओळखला जातं. सुरभी या गोलोकात नित्य निवास करते आणि त्यांच्या कन्या भूलोकात पृथ्वीवर राहतात. 
 
या गोलोकाचे अधिपती गोविंद अर्थात भगवान श्रीकृष्ण आहे. सूरभी एकदा इंद्रदेवाच्या दारावर भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला गेली असता पशुराज्याच्या विषयांची श्रीकृष्णाची सदिच्छा पाहून त्यांना आपल्या गोलोकाचा इंद्र म्हणून निवडले. भगवान श्रीकृष्णाचे गौ प्रेम सर्वत्र प्रसिद्ध आहे.
 
तर काही मतांप्रमाणे सुरभींना गोलोकात श्रीकृष्णाने आपल्या शरीराच्या डाव्या भागाने उत्पन्न केले. नंतर सुरभीच्या छिद्रातून करोडो गायी आणि वासरे जन्माला आली.
 
एका इतर कथेप्रमाणे ब्रह्मा एका मुखाने दूध पित असताना दुसर्‍या मुखातून फेन निघाले आणि त्याने सुरभीची उत्पत्ती झाली.
 
तर पौराणिक कथेनुसार कामधेनू गाय ही 14 रत्नांपैकी एक होती जी देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून बाहेर पडली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शुक्रवारची

एकाच गोत्रात लग्न का करत नाही? या मागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण जाणून घ्या....

Guruvar Upay for Marriage गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग

गंगा सप्तमी 2026: तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

गंगा सप्तमी का साजरी केली जाते? जाणून घ्या पौराणिक कथा

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments