Festival Posters

गणपतीचे कापलेले डोके कुठे गेले? माहित नसेल तर नक्की वाचा

Webdunia
बुधवार, 16 एप्रिल 2025 (13:04 IST)
भगवान श्री गणेशाची जन्मकथा खूप मनोरंजक आहे आणि ही कहाणी सर्वांनाच माहिती आहे. शिवपुराणातील या कथेनुसार, देवी पार्वतीने आपल्या शरीराच्या लेपपासून भगवान गणेशाला जन्म दिला. नंतर जेव्हा माता पार्वती स्नान करायला जात होत्या तेव्हा त्यांनी भगवान गणेशाला कोणालाही प्रवेश देऊ नये असे सांगितले. पण काही वेळाने भगवान शंकर तिथे आले आणि देवी पार्वतीकडे जाऊ लागले. हे पाहून त्या मुलाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावर शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशूलाने त्या मुलाचे डोके कापले. हे पाहून देवी पार्वती खूप रागावल्या आणि त्यांच्या क्रोधाच्या आगीमुळे विश्वात अराजकता पसरली. सर्व देवतांनी भगवान शिव यांना त्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा भगवान शिवाच्या विनंतीवरून भगवान विष्णूंने हत्तीचे डोके आणून त्या मुलाच्या शरीरावर ठेवले आणि त्याला पुन्हा जिवंत केले. पण गणेशजींच्या खऱ्या डोक्याचे काय झाले आणि ते सध्या कुठे आहे?
 
ऐपौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिव यांनी आपल्या त्रिशूळाने गणेशाचे डोके धडापासून वेगळे केले तेव्हा ते डोके जमिनीखाली एका गुहेत पडले. ही गुहा डोंगराच्या सुमारे ९० फूट आत बांधलेली आहे. त्रेता युगात अयोध्येवर राज्य करणारे सूर्यवंशी राजा ऋतुपर्णा यांनी ही गुहा शोधून काढली होती. एका हरणाचा पाठलाग करताना राजाला ही गुहा सापडली. असे मानले जाते की या गुहेत सापडलेले चार दगड चार युगांचे प्रतिनिधित्व करतात आणि चौथा दगड कलियुगाचे प्रतीक आहे. हा चौथा दगड दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्या दिवशी चौथा दगड गुहेच्या भिंतीला स्पर्श करेल, त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल अशी पौराणिक मान्यता आहे.
 
आजच्या काळात ही गुहा पाताळ भुवनेश्वर म्हणून ओळखली जाते. या गुहेत स्थापित केलेल्या गणेशाच्या मस्तकाला आदि गणेश म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की जो कोणी आदि गणेशाचे दर्शन घेतो आणि त्यांच्या मस्तकाची पूजा करतो, त्याचा अहंकार त्याच्या अंतर्मनातून नष्ट होतो. पाताळ भुवनेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेले हे ठिकाण उत्तराखंडमधील पिथोरागडच्या गंगोलीहाटपासून १४ किलोमीटर अंतरावर आहे. या गुहेबद्दल अशीही एक श्रद्धा आहे की भगवान शिव स्वतः येथे गणेशाच्या डोक्याचे रक्षण करतात आणि त्याची काळजी घेतात.
ALSO READ: बाळासाठी गणपती बाप्पाची नावे Lord Ganesha Names for Baby Boy
तर काही इतर मान्यतेनुसार, जेव्हा भगवान शिव यांनी आपल्या त्रिशूळाने गणेशाचे डोके कापले तेव्हा ते डोके गंगेत तरंगले. गंगेत वाहून गेल्यामुळे गणेशजींचे मूळ डोके कायमचे हरवले असे मानले जाते. नंतर भगवान शिव यांनी हत्तीचे डोके गणेशाच्या धडाला जोडले आणि त्याला पुन्हा जिवंत केले.
 
दुसऱ्या एका मान्यतेनुसार, गणेशजींचे कापलेले डोके देवतांनी स्वर्गात नेले आणि सुरक्षित ठेवले. हे डोके अजूनही दैवी क्षेत्रात अस्तित्वात आहे आणि गुप्तपणे त्याची पूजा केली जाते. त्याच वेळी, काही तंत्र ग्रंथांनुसार, गणेशाचे डोके एका दैवी शक्तीमध्ये रूपांतरित झाले आणि शिवलिंगात विलीन झाले. म्हणूनच गणेशाची पूजा सर्वात आधी केली जाते कारण त्यांचे मूळ डोके भगवान शिवाच्या शक्तीमध्ये लीन झाले आहे.
 
अस्वीकारण: हा लेख धार्मिक माहितीवर आधारित असून केवळ माहितीसाठी दिला जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

Maha Shivaratri 2026: महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये?

विनाशातून सृजनाकडे: महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय?

Holi 2026 Essay in Marathi होळी निबंध मराठी

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026 श्री गजानन महाराजांचे आवडते नैवेद्य पाककृती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments