Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्रीच्या वेळेस घराची साफ सफाई का म्हणून करू नये?

Webdunia
बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (15:45 IST)
प्राचीन काळापासून बहुतांश घरांमध्ये आजही रात्रीच्या वेळी साफ-सफाई, स्वच्छता केली जात नाही अशी प्रथा चालू असून यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्वही आहे. येथे जाणून घ्या, रात्रीच्या वेळी घरामध्ये साफ-सफाई का करू नये.
 
रात्रीच्या वेळी कचरा घराबाहेर फेकणे अशुभ असते...
घरामध्ये कोणत्याही प्रकारची धूळ, कचरा असणे आरोग्यासाठी तर हानिकारक असतेच त्याचबरोबर घर-कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी अस्वच्छता अशुभ मानली जाते. घर स्वच्छ असल्यास आपले मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहते. घरामध्ये अस्वच्छता असेल तर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी कचरा घराबाहेर फेकणे अपशकून मानले जाते. याच कारणामुळे रात्रीच्या वेळी साफ-सफाई करणे वर्ज्य आहे.
 
यामुळे रात्री घरात साफ-सफाई करू नये...
रात्री घरामध्ये साफ-सफाई करणे वर्जित आहे. सकाळच्या वेळी घरात साफ-सफाई केल्यानंतर घरातील सर्व सदस्य स्नान करतात, ज्यामुळे शरीरावरील किटाणू साफ होतात. शरीरावरील किटाणू नष्ट झाल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते. जर रात्रीच्या वेळी घरामध्ये स्वच्छता केली तर धूळ, किटाणू पुन्हा घरातील सदस्यांच्या शरीरावर चिटकतील रात्रीच्या वेळी सर्व सदस्य स्नानही करत नाहीत, त्यामुळे ते किटाणू आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या कारणामुळे रात्री घरामध्ये साफ-सफाई करू नये.

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments