Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किरणकुमार रेड्डी करणार नव्या पक्षाची स्थापना

Webdunia
शुक्रवार, 7 मार्च 2014 (11:09 IST)
स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्दय़ावरून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे किरणकुमार रेड्डी नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. तसेच त्यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
 
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर किरणकुमार रेड्डी यांनी काँग्रेसला रामराम करत नव्या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तेलंगणा निर्मितीचे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. रेड्डी यांच्याबरोबर तेलंगणाच्या निर्मितीला विरोध असणारे नेतेही या पक्षात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 
रेड्डी यांनी तेलंगणाच्या निर्मितीवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकांबरोबर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर तेलंगणा व सीमांध्र अशी दोन राज्ये निर्माण करण्यात येणार आहेत. स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती 2 जूनला अधिकृतरीत्या करण्यात येणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

Show comments