Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तान : एका ट्रेनला लागली आग, 65 लोकांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 31 ऑक्टोबर 2019 (12:09 IST)
पाकिस्तानी रेल्वेच्या तेजग्राम एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत कमीतकमी 46 जणांचा मृत्यू झाला आहे. ही गाडी कराचीहून रावळपिंडीला जात होती. लियाकतपूर जवळ पोहोचत असताना गाडीच्या 3 बोगींना आग लागली.
 
पोलीस अधिकारी रहीम खान यांनी 65 जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचही त्यांनी सांगितलं आहे.
 
रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार तबलीगी जमातीच्या लोकांचा समुह लाहोरला एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात होता. त्यांच्या जवळ खाण्यापिण्याच्या वस्तू आणि गॅस सिलिंडर होते. सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे.
 
आग अटोक्यात आल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचही त्यांनी सांगितलंय. गाडी रुळावरून घसरलेली नाही, त्यामुळे तिल लवकरच लियाकतपूरमध्ये पोहोचलं जाईल, असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे.
 
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसंच पीडितांना योग्य उपचार आणि मदतीचे आदेश दिले आहेत. गाडी आणि प्रवाशांचा विमा काढण्यात आला होता, त्यामुळे नुकसान भरपाई करता येईल असं रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे एकाच नावावर या गाडीच्या काही बोगी बुक झाल्याच रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं आहे.

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments