Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Earthquake : जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप, सुनामीचा इशारा

Webdunia
सोमवार, 1 जानेवारी 2024 (14:20 IST)
Earthquake :नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जपानमधून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. येथील उत्तर-पूर्व भागात 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. त्यामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या मोठ्या भागाला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही.
 
एका अहवालानुसार, सुनामीच्या इशाऱ्यानंतर लोकांना इशिकावा, निगाता, तोयामा आणि यामागाता प्रांतातील किनारी भाग लवकरात लवकर सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 5 मीटर (16 फूट) उंच लाटा येण्याची शक्यता आहे. किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.टोकियो आणि संपूर्ण कांटो परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.
 
मार्च 2011 मध्ये जपानमध्ये नऊ तीव्रतेची विनाशकारी त्सुनामी आली होती. त्यानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटांनी फुकुशिमा अणु प्रकल्प उद्ध्वस्त केला. पर्यावरणाची हानी होण्याच्या दृष्टीने ही मोठी घटना मानली जात होती. त्यानंतर समुद्रात 10 मीटर उंच लाटांनी अनेक शहरांमध्ये विध्वंस केला. यामध्ये सुमारे 16 हजार लोकांचा मृत्यू झाला.

जपान भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भागात आहे. ते पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये येते. रिंग ऑफ फायर हे असे क्षेत्र आहे जेथे महासागरीय टेक्टोनिक प्लेट्स कॉन्टिनेंटल प्लेट्ससह अस्तित्वात आहेत. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंप होतो. त्यांच्या प्रभावामुळेच त्सुनामी होतात आणि ज्वालामुखीही फुटतात.
 
गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला फिलीपाईन्समध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.8 इतकी मोजली गेली. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने सांगितले की, सकाळी 01.20 च्या सुमारास भूकंप झाला. त्याचे केंद्र मिंडानाओ येथे 82 किमी खोलीवर होते. 
 
यूएस त्सुनामी चेतावणी प्रणालीने सुरुवातीला फिलीपिन्स किनारपट्टीच्या काही भागांमध्ये तीन मीटर (10 फूट) पर्यंतच्या लाटा येण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु नंतर त्सुनामीचा धोका नसल्याचे घोषित केले. निवेदनात म्हटले आहे की सर्व उपलब्ध डेटाच्या आधारे भूकंपामुळे सुनामीचा धोका आता दूर झाला आहे
 
Edited By- Priya DIxit   
 
  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

...तर Pok चे भारतात विलीनीकरण शक्य झाले असते, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मोठे वक्तव्य

आर्वीमध्ये हरणाची शिकार करणाऱ्या 3 जणांना अटक, वनविभाग ने मांस विक्री करतांना पकडले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा भारत आणि पाश्चात्य देशांसाठी का आहे महत्त्वाचा?

शाळेमध्ये 10वी क्लासच्या विद्यार्थ्यांचा हार्ट अटॅक ने मृत्यू

Pune अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडले

सर्व पहा

नवीन

विक्ट्री परेडचा असली हिरो मुंबई पोलीस शिपाई, गर्दीमध्ये असे वाचवले महिलेचे प्राण

महाराष्ट्र : मुसळधार पावसानंतर ठाणे-पालघर मध्ये पूर परिस्थिती, NDRF ने 65 लोकांना वाचवले

मुंबई हिट अँड रन केस वर्ली प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, दोन जणांना अटक

‘खासगी कॉलेजात सव्वा कोटी रुपये मागितले,’ भारतातील विद्यार्थी MBBS करण्यासाठी परदेशात का जातात?

मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळा -कॉलेजांना सुट्टी जाहीर

पुढील लेख
Show comments