Festival Posters

एका आठवड्याने चिनी सागरात जळणारा टॅंकर बुडाला

Webdunia
सोमवार, 15 जानेवारी 2018 (09:16 IST)
पूर्व चिनी सागरात गेले आठवडाभर जळत असलेले इराणी तेलवाहू जहाज सांची आज चिनी सागरात बुडाल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली आहे. या तेलवाहू जहाजावर असलेल्या 30 इराणी आणि 2 बांगला देशी अशा 32 खलाशांपैकी कोणीही वाचले असण्याची शक्‍यता नसल्याचे इराणी अधिकारी मोहम्मद रास्तद यांनी स्पष्ट केले आहे. 32 पैकी 3 मृतदेह लाइफ बोटीवर मिळाले. सांचीवरील ब्लॅक बॉक्‍स सापडला होता, मात्र त्यातील विषारी वायूंमुळे तो पुन्हा टाकून द्यावा लागला. आठवडाभर 13 जहाजे अणि इराणी कमांडो सांचीच्या बचाव कार्यात गुंतलेले होते.
 
6 जानेवारी रोजी शांघायपासून 260 किमी अंतरावर सांची आणि एका मालवाहू जहाजाची टक्कर झाली होती. सांची तेलवाहू जहाज 1 लाख 36 हजार टन अल्ट्रा लाइट क्रूड्‌ घेऊन दक्षिण कोरियाला जात होते. त्याची टक्कर हॉंगकॉंगमध्ये नोंदणी असलेल्या अमेरिकेहून धान्य घेऊन येणाऱ्या क्रिस्टल या मालवाहू जहाजाशी झाली होती. क्रिस्टकवरील सर्व खलाशांना वाचवण्यात आले. मात्र टकरीचे कारण समजू शकले नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments