Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हृदय द्रावक ! मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागात, वडिलांनी कुटुंबातील 7 जणांना जिवंत जाळले

Webdunia
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (13:53 IST)
आजच्या काळात काय होईल काहीच सांगता येत नाही. एका मुलीने आपल्या वडिलांच्या मनाविरुद्ध प्रेम विवाह केल्याच्या कारणावरून वडिलांनी कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळून टाकण्याची घटना समोर आली आहे. ही घटना आहे पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुजफ्फरगड येथील . इथे एका वडिलाने आपल्या दोन मुली आणि त्यांच्या  कुटुंबातील 7 जणांना जिवंत जाळले आहे. मंजूर हुसेन असे या आरोपीचे नाव असून त्याच्या मुलीने प्रेम विवाह केला म्हणून रागाच्या भरात येऊन आपल्या  घराला आग लावली.या घरात त्याची मुलगी फौजिया बीबी आणि खुर्शीद माई आपल्या कुटुंबियांसह राहायचा.सुदैवाने फौजिया बीबीचे पती मेहमूद अहमद घरी नसल्याने ते बचावले. या आगीत मंजूर हसन ची मुलगी फौजिया बीबी आणि खुर्शीद माई आणि खुर्शीद यांचे पती आणि फौजिया आणि खुर्शीद यांची चार अल्पवयीन मुले मरण पावली आहे.
 
फौजिया बीबीचे पती आणि आरोपीचे जावई मेहमूद अहमद कामा निमित्त बाहेर गेले होते.त्यांनी घरी परत येताना  घराला आग लागलेली बघितली आणि घटनास्थळ वरून आरोपी सासरे आणि शालक साबीर हुसेन यांना पळून जाताना बघितले. जावई महमूद याने आरोपी सासऱ्या आणि शालकाच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. 
पोलिसांना मेहमूद यांनी सांगितल्यानुसार मेहमूद आणि फौजिया बीबी ने 2020 साली प्रेम विवाह केला होता. या विवाहाला आरोपी मंजूर हुसेन यांची परवानगी न्हवती.ते या लग्नाचा विरोध करत होते. या कारणास्तव ते आमच्यावर चिडले होते. त्यातूनच त्यांनी हे केले  .
या घटनेत मेहमूद अहमद यांच्या पत्नी फौजिया आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून आरोपीला अटक केली आहे. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments