Festival Posters

भारताच्या 68 मच्छिमारांना पाकिस्तानने सोडले

Webdunia
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (12:26 IST)
मासेमारी करताना सागरी हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या 68 भारतीय मच्छिमारांची आज सुटका करण्यात आली. सद्‌भावना कृती म्हणून पाकिस्तानने या मच्छिमारांची सुटका केली. या सर्व मच्छिमारांना कराचीतील लंधी तुरुंगात ठेवण्यात आले होते. हे सर्व मच्छिमार लाहोरहून रेल्वेने वाघा सीमेवर आणण्यात येतील आणि त्यानंतर ते भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने शनिवारी याबाबतचे आदेश दिले असल्याचे सिंध प्रांताचे गृह विभागाचे अधिकारी नसीम सिद्दीकी यांनी सांगितले.
 
पाकिस्तानातील ईधी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या मच्छिमारांना रोख रक्कम, काही भेटवस्तू आणि शुभेच्छा दिल्या. जुलै महिन्यात भारताच्या 78 मच्छिमारांना सागरी हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल पाकिस्तानने पकडले होते आणि लंधी तुरुंगात ठेवण्यात आले होते. या तुरुंगामध्ये भारताचे अजून 200 मच्छिमार असल्याचेही नसीम सिद्दीकी यांनी सांगितले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आणि यावर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तान सरकारने दोन तुकड्यांमध्ये भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. जानेवारी ते डिसेंबरदरम्यान 12 दिवसांमध्ये एकूण 438 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments