Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Israel-Hamas Conflict : हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 300 ठार,गाझामध्ये 230 ठार

Webdunia
रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (11:26 IST)
Israel-Hamas Conflict :इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने शनिवारी अचानक केलेल्या हल्ल्यात 300 हून अधिक इस्रायलींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी, इस्रायलकडून केलेल्या पलटवारात गाझा पट्टीमध्ये सुमारे 250 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, अमेरिका आणि भारतासह अनेक देशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनीही इस्रायलवरील हल्ले पाहता आठ अब्ज डॉलर्सची आपत्कालीन मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. 
 
हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलचे लोक खूपच घाबरले आहेत. शनिवारी हमासचे दहशतवादी पॅराग्लायडर, बोट आणि मोटरसायकलने घुसले आणि त्यांनी नागरिकांवर खुलेआम गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात सुमारे 400 इस्रायली मारले गेले. हमासच्या दहशतवाद्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे इस्रायलमधील लोकांना घरांमध्येच राहावे लागले आहे. तथापि, इस्रायलमध्ये राहणार्‍या प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या घरात बॉम्ब निवारे बांधले आहेत. 
 
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या हल्ल्यात 300 हून अधिक इस्रायली लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, संतप्त इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दहशतवादी संघटनेचे सर्व तळ उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली आहे. त्यांनी सर्व गझनवासियांना ताबडतोब शहर सोडण्याचा इशारा दिला आणि हमासचा नायनाट करण्यासाठी देश आपली सर्व शक्ती वापरेल असे सांगितले.
 
पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील वातावरण तापले आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. दरम्यान, नुसरत भरुचाबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात ही अभिनेत्री इस्रायलमध्ये अडकली आहे. खुद्द नुसरतच्या टीममधील एका सदस्याने ही माहिती दिली असून अभिनेत्रीच्या संपर्काबाबतच्या वक्तव्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे
 
 








Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

सर्व पहा

नवीन

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

कोटा मध्ये आत्महत्येचा आकडा 14, JEE ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद

पुढील लेख
Show comments