Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निकाल

Webdunia
गुरूवार, 18 मे 2017 (08:56 IST)
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात लागणार आहे.
 
भारत आणि पाकिस्तानचा युक्तीवाद पूर्ण झाला असून उद्या (गुरुवारी) 3.30 वाजता याबाबत निकाल सुनावला जाणार आहे.
 
सोमवारी झालेल्या सुनावणीत ज्या व्हिडिओच्या आधारावर पाकिस्तान आपली बाजू मांडणार होते, तो कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडिओ कोर्टात दाखवण्यास परवानगी नाकारात आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानाला मोठा दणका दिला होता.
 
‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
 
त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. आंतरराष्ट्रीय कोर्टानं यापूर्वीच कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.
 
भारताच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी भारताची बाजू भक्कमपणे कोर्टासमोर मांडली. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे, असा दावा भारताच्या वतीने कोर्टासमोर करण्यात आला.
 
15 एप्रिलला (सोमवारी) दुपारी दीड वाजता सुनावणीला सुरुवात झाली. या सुनावणीचं थेट प्रक्षेपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वेबसाईटवर करण्यात आलं.
 
हेरगिरी करत असल्याचा आरोप करत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली.
 
त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments