Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताचे मानवरहित चांद्रयान 8 वर्षांनंतर सापडले

Webdunia
भारताने 2008 साली पाठविलेले मानवरहित चांद्रयान 1 अजूनही चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत असल्याची माहिती अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने-नासाने दिली आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागपासून 200 किमी अंतरावरून चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. 29 ऑगस्ट 2009 रोजी चांद्रयान-1चा इस्रोशी संपर्क तुटला होता. त्यामुळे ते हरवले असे गृहीत धरण्यात आले होते. परंतु तब्बल 8 वर्षांनंतर नासाच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-1 चा शोध घेण्यात यश मिळवले आहे.अत्यंत लहान आकाराचे(1.5 घनमीटर आकाराचे), म्हणजे साधारणत: मारुती 800 कारएवढे चांद्रयान-1 शोधणे मोठे कठीण काम होते, असे कॅलिफोर्नियातील राडार शास्त्रज्ञ मरिना ब्रोझोविक यांनी म्हटले आहे. त्यासाठी थोडी डिटेक्‍टिव्हगिरी करावी लागली असे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी इंटर प्लानेटरी राडारचा वापर करावा लागला. सामान्यत: इंटर प्लानेटरी राडारचा उपयोग हा पृथ्वीपासून लाखो किमी अंतरावरील लघुग्रह शोधण्यासाठी केला जातो.  चांद्रयान-1 चा भ्रमणकाल हा दोन वर्षांचा अपेक्षित होता, त्यामुळे 9 वर्षांनंतर अंतराळात टिकून आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. अर्थात चांद्रयान-1 काहीही संदेश पाठवू अथवा स्वीकारू शकत नसल्याने आता केवळ “स्पेस जंक’ – आकाशातील कचरा बनले आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments