Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहशतवादाचा बिमोड करायला हवा-नरेंद्र मोदी

Webdunia
गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (11:38 IST)
मुंबईवरील 26/11च्या सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण झालीत. या हल्ल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क परिषदेत उपस्थित केला. दहशतवादाने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. त्यामुळे सर्वांनी दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. त्यासाठी सार्क देशांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी नेपाळमधील सार्क परिषदेत केले.
 
मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला अन्य सार्क देशांच्या प्रतिनिधींचा उल्लेख केला. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा उल्लेख मोदी यांनी टाळला. पाकिस्तानसाठी हा कठोर इशारा असल्याचे बोलले जात आहे. 
 
दरम्यान, सार्क देशांच्या समस्या आणि विकासासाठी प्रयत्न करण्यावर भर मोदींनी दिला. सार्क देशांमध्ये आपापसातील सहकार्य, व्यापार आणि दळणवळण वाढण्याची गरज मोदींनी यावेळी व्यक्त केली.
 
पुढे वाचा मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...
> दहशतवादाचा उखडून टाकण्यासाठी सार्क देशांनी एकत्र यावे.
> दक्षिण आशियाई विद्यापीठाची निर्मितीसाठी प्रयत्न
> सार्क देशांनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यावर भर
> भारतीय गुंतवणुकदारांच्या माध्यमातून तरूणांसाठी रोजगाराची निर्मिती
> सार्क देशांनी उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर मिटवण्यावर भर
> भारतातील पायाभूत सुविधांचा विकासावर भर
> पायाभूत सुविधा ही सार्क देशांपुढील महत्वपूर्ण समस्या आहे.
> आपल्याला भूतकाळ विसरुन पुढे जायला हवे
> सार्क देश समान समस्यांचा सामना करतायेत

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments