भूकंपाच्या धक्यानंतर येथील खैबर पख्तुनख्वा प्रांतात वादळी पावसाने थैमान घातले आहे. यामध्ये मोठे नुकसान झाले असून ४५ ठार झाले आहेत तर शेकडो नागरिक जखमी आहेत. अचानक झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरे कोसळली असून झाडे पडली आहेत.
वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.