Festival Posters

IPL 2022 Final: आयपीएल फायनलच्या वेळापत्रकात बदल

Webdunia
शुक्रवार, 20 मे 2022 (14:25 IST)
आयपीएलचा 15वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (22 मे) साखळी फेरीतील 70 सामने पूर्ण होतील. यानंतर अहमदाबाद आणि कोलकाता येथे प्लेऑफचे आयोजन करण्यात येणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने 24 आणि 25 मे रोजी कोलकातामध्ये खेळवले जातील. त्यानंतर 27 आणि 29 मे रोजी अनुक्रमे क्वालिफायर-2 आणि फायनल होईल.
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) IPL फायनलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (29 मे) होणारा अंतिम सामना साडेसात वाजता सुरू होणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रात्री आठ वाजल्यापासून विजेतेपदाचा सामना सुरू होऊ शकतो. समारोप समारंभ लक्षात घेऊन बीसीसीआय हा निर्णय घेऊ शकते.
 
फायनलपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर समारोप सोहळा होणार आहे. यामध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता समारोप सोहळा सुरू होणार आहे. हे किमान 50 मिनिटे टिकेल. अशा स्थितीत नाणेफेक साडेसात वाजता होणार आहे. 30 मिनिटांनंतर सामना सुरू होईल.
 
बोर्ड पुढच्या हंगामापासून आयपीएल सामन्यांच्या वेळेत बदल करण्याचा विचार करत असल्याची चर्चा असताना ही बातमी समोर आली आहे. पुढील वर्षीपासून दुपारचे सामने आता दुपारी 3 ऐवजी 4 वाजता सुरू होतील. त्याच वेळी, संध्याकाळी 7:30 वाजताचा सामना रात्री 8 वाजता सुरू होऊ शकतो. पहिल्या 10 सीझनमध्ये (2008-17) सुरू होणाऱ्या सामन्याची ही वेळ होती.
यावर्षीही 26 मार्चला होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा झाला नाही. समारोप समारंभ आयोजित करण्याचा निर्णय नंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

भारत अफगाणिस्तानसोबत एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार, बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले

ZIM vs SA :दक्षिण आफ्रिकेकडून झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव करत सुपर एट मध्ये प्रवेश

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

सेमीफायनलमध्ये लंकेवर ५ धावांनी विजय मिळवूनही पाकिस्तान टी-२० विश्वचषकातून बाहेर

IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका २-० अशी जिंकली

पुढील लेख
Show comments