Marathi Biodata Maker

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

Webdunia
शुक्रवार, 17 मे 2024 (18:35 IST)
IPL 2024 मधील 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. मुंबई इंडियन्स आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. या मोसमातील मुंबईचा हा शेवटचा सामना आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून संघाला सीझन-17 च्या मोहिमेचा शेवट करायचा आहे.मुंबईसाठी रोहितचा हा शेवटचा आयपीएल सामना असेल असे चाहत्यांना वाटते.
 
रोहितने आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरुवात केली होती पण नंतरच्या काही सामन्यांमध्ये हिटमॅनचा खेळ चांगला झाला नाही. या हंगामात, रोहितने सीएसकेविरुद्ध अप्रतिम शतक झळकावले होते, तेव्हापासून हा हिटमॅन सतत फ्लॉप ठरत आहे. आज मुंबई इंडियन्स या मोसमातील शेवटचा सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचा आयपीएलमधील मुंबई इंडियन्ससाठी हा शेवटचा सामना असू शकतो, असे चाहत्यांना वाटते.
 
या हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले होते. यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि हा संघ प्रथमच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. आत्तापर्यंत मुंबईने 13 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 4 सामने जिंकले असून 9 सामने गमावले आहेत. सध्या मुंबई पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. मुंबईच्या खराब कामगिरीबाबत कर्णधार हार्दिकवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हार्दिकला त्याच्या खराब कर्णधारामुळे प्रत्येक सामन्यात ट्रोल करण्यात आले आहे.

Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

शुभमन गिलचे टीम इंडियामध्ये पुनरागमन, कटक T20 साठी संघात सामील

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर कोहली लंडनला रवाना; विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात परतणार

स्मृती मंधाना आणि पलाश यांचे नाते संपुष्टात आले, दोघांनी लग्न रद्द केल्याची घोषणा केली

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000धावा पूर्ण केल्या

भारताने दक्षिण आफ्रिकेला नऊ विकेट्सने हरवून मालिका जिंकली

पुढील लेख
Show comments