Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक अब्जाहून अधिक भारतीय ‘ऑफलाइन’

Webdunia
गुरूवार, 12 मे 2016 (14:38 IST)
केंद्र सरकारतर्फे ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी, अद्याप देशातील एक अब्जांहून अधिक जनतेपर्यंत इंटरनेट पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. रिटेल बँकिंग, ऑनलाइन खरेदी आणि वित्तीय व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून होऊनही बरेच घटक या मायाजालापासून वंचित राहिल्याचे ‘जागतिक बँके’च्या अहवालात म्हटले आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार दहापैकी आठ भारतीय स्मार्टफोनचा वापर करीत असले, तरी अद्याप प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन स्थिरावलेला नाही. म्हणूनच सर्वापर्यंत इंटरनेट पोहोचणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत पुरेशी वाढ, नव्या रोजगाराच्या संधी आणि सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा होणे अशक्य होऊन बसले आहे. त्यासाठी केंद्र सरकारला डिजिटल डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीविषयक काम करण्याची आवश्यकता असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक बँकेचे सहसंचालक दीपक मिश्र यांनी सादर केलेल्या अहवालानुसार केंद्र सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून आज भारताकडे पाहिले जाते. देशातील बीपीओ क्षेत्रामध्ये 31 लाख कर्मचारी सध्या कार्यरत असून, त्यातील 30 टक्के कङ्र्कचारी महिला आहेत. जागतिक बँकेचे देशातील संचालक ऑनो रुही यांच्या मते केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणार्‍या डिजिटल इंडिया आणि आधार यांसारख्या योजनांमुळे तंत्रज्ञानाधारित समाज तयार करण्याच्या मोहिमेला गती मिळत आहे. भारतात चीन आणि अमेरिकेनंतर सर्वाधिक संख्येने इंटरनेट ग्राहक आहेत. जागतिक बँकेच्या ‘वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2016 : डिजिटल डिव्हिडंड’ या अहवालानुसार सध्या भारतातील इंटरनेट यूजरची संख्या 20 कोटी असून, चीनमधील नेटिझन्सची संख्या 66.5 कोटी आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

शिवराज यांच्या मार्गावर शिंदे सरकार, राज्यामध्ये होऊ शकते लाडली बहना सारख्या योजनेची सुरवात

सर्व पहा

नवीन

रस्ते खराब असतील तर टोल टॅक्स घेणे चुकीचे, लोक तर भडकतीलच- नितिन गडकरी

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments