Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

6 तासांपेक्षा जास्त वेळ भारतीय इंटरनेटवर

Webdunia
शनिवार, 4 ऑक्टोबर 2014 (11:38 IST)
देशात इंटरनेटचं महत्त्व किती आहे? हे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात समोर आलंय. जवळपास 46% भारतीय दररोज आपल्या दिवसातले जवळपास सहा तास किंवा यापेक्षाही जास्त तास इंटरनेटवर घालवतात, असं या सर्वेक्षणात समोर आलंय. इंटरनेट बंद असेल तर आपलं काही तरी हरवलंय, असा भास आपल्याला सतत होत राहतो किंवा तशी भीती मनात कायम असते, असं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास 82% व्यक्तींचं म्हणणं होतं. टाटा कम्युनिकेशन्सनं आपल्या ‘कनेक्टेड वर्ल्ड-2’ आपल्या रिपोर्टमध्ये हे निष्कर्ष मांडलेत. भारतातील जवळपास 46 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, ते प्रत्येक दिवशी 6 तास किंवा यापेक्षा अधिक वेळ इंटरनेटवर व्यतीत करतात.

सर्वेक्षणात फ्रान्स, जर्मनी, भारत, सिंगापूर, अमेरिका आणि ब्रिटन इथले जवळपास 9,417 इंटरनेट युजर्सना सहभागी करून घेण्यात आलं होतं. तर भारतातल्या 2,117 इंटरनेट युजर्स यात सहभागी झाले होते. अहवालानुसार, जवळपास 56 टक्के भारतीयांच्या म्हणण्यानुसार, ते इंटरनेटशिवाय पाच तासांपेक्षा जास्त वेळ राहूच शकत नाहीत. यामध्ये, भारतीय पुरुष महिलांच्या प्रमाणात अधिक वेळ इंटरनेटवर घालवतात. परंतु, जवळपास 21 टक्के महिला इंटरनेटशिवाय राहू शकत नाहीत. तर केवळ 16 टक्के पुरुषांना इंटरनेट नसेल तर काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments