Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

JIO ने 94 लाख ग्राहक जोडले, तर Airtel, Vodafone-Idea ने 3 कोटी ग्राहक गमावले

Webdunia
बुधवार, 22 मे 2019 (14:56 IST)
व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलने मार्चमध्ये संयुक्तपणे सुमारे 3 कोटी ग्राहक गमावले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात व्होडाफोन-आयडिया च्या ग्राहकांची संख्या 1.45 कोटी कमी झाली आहे तर भारती एअरटेलचे 1.51 कोटी कनेक्शन कमी झाले आहे. त्याच वेळी JIO ने 94 लाख ग्राहक जोडले आहे.
 
आकडेवारीनुसार, 31 मार्च 2019 पर्यंत देशात एकूण मोबाइल ग्राहकांची संख्या 116.18 कोटी होती जे मागील महिन्याच्या तुलनेत 2.18 कोटी कमी आहे. मार्चच्या अखेरीस देशात एकूण फोन घनता कमी होऊन 90.11 वर आली आहे, जे फेब्रुवारीमध्ये 91.86 होतं. ट्रायनुसार मार्च 2019 पर्यंत, व्होडाफोन-आयडिया च्या मोबाइल कनेक्शनची संख्या 39.48 कोटी होती. मार्चच्या अखेरीस भारती एअरटेलच्या मोबाइल ग्राहकांची संख्या 32.51 कोटी राहिली, जेव्हा की त्याच्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओकडे 30.67 कोटी ग्राहक होते. 
 
ट्रायनुसार मार्चमध्ये एकूण ग्राहकांची संख्या 116.18 कोटी होती, हे फेब्रुवारीच्या अखेरीस 118.36 कोटी होती. शहरी भागात मार्चच्या शेवटी मोबाइल ग्राहकांची संख्या 65.04 कोटी राहिली, जे फेब्रुवारीच्या शेवटी 65.65 कोटी होती. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही मोबाइल ग्राहकांची संख्या 52.71 कोटीहून कमी होऊन 51.13 कोटी राहून गेली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments