Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकदाच चार्ज केल्यावर आठवडाभर सुरू राहील मोबाइल

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2016 (11:39 IST)
लवकरच मोबाइलला आठवडय़ात एकदाच चार्ज करावे लागणार असून मोबाइल फोनसाठी एक स्मार्ट ग्लास ब्रिटनच्या संशोधकांनी बनविला असून यामुळे बॅटरी खर्च होणार नाही. 
 
हा शोध स्मार्टफोनच्या युगात उपयुक्त ठरू शकतो. यामुळे 90 टक्के बॅटरी मोबाइलमध्ये स्क्रीनसाठी खर्च होते. अशा स्थितीत वापरकर्त्याला रोज मोबाइल फोन चार्ज करावा लागणार नाही आणि आठवडय़ात फक्त एकदाच चार्ज करावा लागेल. तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्या बॅटरी कमी खर्च करण्याशी संबंधित संशोधन करत आहेत. परंतु मोबाइलची स्क्रीन बदलल्यामुळे सर्वात चांगले परिणाम पाहावयास मिळतील असे संशोधकांचे म्हणणे आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी संबंधित इंजिनियर डॉ. रेयमेन हॉसिनी जे या संशोधनाशी निगडित आहे, त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही प्रत्येक रात्री आपला मोबाइल चार्ज करण्यासाठी लावतो, परंतु आम्ही स्मार्ट ग्लासचा वापर केला तर आठवडय़ात एकदाच मोबाइल फोन चार्ज करावा लागेल. अनेक कंपन्या मोबाइलची बॅटरी दीर्घकाळापर्यंत चालावी यासाठी काम करत आहेत. यात एक नाव अँपलचेदेखील आहे. अँपलने चालूवर्षी याच्याशी संबंधित एका तंत्रज्ञानाचे पेटंटदेखील घेतले आहे. या तंत्रज्ञानाने मोबाइलची बॅटरी अनेक आठवडय़ांपर्यंत चालेल, असे अँपलचे म्हणणे आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments