Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानातून निवडणूक जिंकतील कॉंग्रेसचे नेते – राम माधव

2019 lok sabha elections
Webdunia
सोमवार, 25 मार्च 2019 (09:55 IST)
कॉंग्रेसने पाकिस्तानात निवडणूक लढवली तर नक्की विजयी होईल, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस पक्ष आणि पाकिस्तान दोघेही खोट्याच गोष्टींचा प्रचार करत असतात, असेही ते म्हणाले.
 
कॉंग्रेसच्या नेते पाकिस्तानातील लोकांची भाषा वापरत असते. कॉंग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये आणि मते भारतापेक्षा पकिस्तानातच अधिक लोकप्रिय होत असतात. त्यामुळे कॉंग्रेसने जर पाकिस्तानची निवडणूक लढवली तर नक्की विजयी होईल. आपल्या विरोधी पक्षाची ही अवस्था झाली आहे, असे माधव पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.
 
सरकार, पार्टी आणि नेत्यांच्याविरोधात बोलण्यासाठी कॉंग्रेसजवळ कोणतही मुद्दा नाही. केवळ असत्य आणि पाकिस्तानवर कॉंग्रेसचा भरवसा उरला आहे. कॉंग्रेसला नक्की काय म्हणायचे आहे. कॉंग्रेसला देशाला नक्की कोणत्या दिशेने न्यायचे आहे, ते कॉंग्रेस पक्षामधील कोणालाही समजत नाही. लोकांनाही कॉंग्रेसची रणनिती काहीही समजत नाही आहे. कॉंग्रेस भारतासाठी लढत आहे की पाकिस्तानसाठी लढत आहे, हेच लक्षात येत नाही, असे ते म्हणाले.
 
कॉंग्रेसकडून केवळ भाजप सरकारच्या यशापयशावरच शंका घेतल्या जात नाहीत. तर भारतीय लष्करावरच शंका घेतल्या जात आहेत. लष्कराबाबत अवमानकारक वक्‍तव्येही केली जात आहेत, असेही माधव म्हणाले.
 
कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी 1,800 कोटी रुपये भाजपच्या बड्या नेत्यांना दिल्याचे वृत्त सपशेल खोटे आहे, असेही राम माधव म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या, आरबीआयच्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या

सकाळी शुभेच्छा दिल्या संध्याकाळी जीभ घसरली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले-मी गुढी बिडी सजवत नाही

काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार

गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments