Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानातून निवडणूक जिंकतील कॉंग्रेसचे नेते – राम माधव

Webdunia
सोमवार, 25 मार्च 2019 (09:55 IST)
कॉंग्रेसने पाकिस्तानात निवडणूक लढवली तर नक्की विजयी होईल, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस पक्ष आणि पाकिस्तान दोघेही खोट्याच गोष्टींचा प्रचार करत असतात, असेही ते म्हणाले.
 
कॉंग्रेसच्या नेते पाकिस्तानातील लोकांची भाषा वापरत असते. कॉंग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये आणि मते भारतापेक्षा पकिस्तानातच अधिक लोकप्रिय होत असतात. त्यामुळे कॉंग्रेसने जर पाकिस्तानची निवडणूक लढवली तर नक्की विजयी होईल. आपल्या विरोधी पक्षाची ही अवस्था झाली आहे, असे माधव पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.
 
सरकार, पार्टी आणि नेत्यांच्याविरोधात बोलण्यासाठी कॉंग्रेसजवळ कोणतही मुद्दा नाही. केवळ असत्य आणि पाकिस्तानवर कॉंग्रेसचा भरवसा उरला आहे. कॉंग्रेसला नक्की काय म्हणायचे आहे. कॉंग्रेसला देशाला नक्की कोणत्या दिशेने न्यायचे आहे, ते कॉंग्रेस पक्षामधील कोणालाही समजत नाही. लोकांनाही कॉंग्रेसची रणनिती काहीही समजत नाही आहे. कॉंग्रेस भारतासाठी लढत आहे की पाकिस्तानसाठी लढत आहे, हेच लक्षात येत नाही, असे ते म्हणाले.
 
कॉंग्रेसकडून केवळ भाजप सरकारच्या यशापयशावरच शंका घेतल्या जात नाहीत. तर भारतीय लष्करावरच शंका घेतल्या जात आहेत. लष्कराबाबत अवमानकारक वक्‍तव्येही केली जात आहेत, असेही माधव म्हणाले.
 
कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी 1,800 कोटी रुपये भाजपच्या बड्या नेत्यांना दिल्याचे वृत्त सपशेल खोटे आहे, असेही राम माधव म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments