Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्र्याचा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल

Webdunia
मंगळवार, 9 एप्रिल 2019 (17:00 IST)
राहुलबाबा आले, भाषण करुन गेले. जे काही बोलले ते काल्पनिक आहे. त्यात काही एक तथ्य नाही. 72 हजार कुठून देणार, हे पैसे येणार कुठून असा सवाल करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तुमच्या पणजोबा, आजीने गरिबी हटावचा नारा दिला, पण हटली नाही”, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केला. लातूरमधील औसा इथं आज शिवसेना-भाजप युतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिले.
 
मुख्यमंत्री म्हणाले, “मोदीजी आणि उद्धवजी जिथं येतात तिथं रेकॉर्ड होतं. लातूर आणि उस्मानाबादमधील ही सभा रेकॉर्डब्रेक असेल, या दोन्ही युतीच्या जागा विक्रमी मताने जिंकून येतील. ही निवडणूक दिल्लीची आहे, गल्लीची नाही, हा देश कुणाच्या हातात सुरक्षित आहे ते ठरवणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडील भुईसपाट करा”अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments