Marathi Biodata Maker

लोकसभेची इव्हीएम व व्हीव्हीपॅट मधील मतमोजणी कशी होते, जाणून घ्या सविस्तर

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (08:40 IST)
देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव सुरु झाला आहे. मात्र अनेकांना प्रश्न पडला आहे की लोकसभेची ही मतमोजणी कशी होणार आहे, कश्या प्रकारे मशीन्स तपासल्या जाणार असून, त्यामुळे निकाल कधी लागणार. त्याबद्लची ही सर्वसाधारण माहिती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या साधारण 18 ते 20 फेऱ्या होतील. तर  एका फेरीसाठी साधारणपणे 30 मिनीटे लागतात. 1 फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्यानंतरच दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. तर  EVM मधील मतांची मोजणी सोबतच VVPAT व्हीव्हीपॅट मतांची मोजणी होईल. त्यामुळे प्रत्येक स्थितीत प्रत्येक फेरीसाठी जवळपास 40 ते 45 मिनीटे लागणार आहेत. त्यामुळे निकाल घोषित होण्यास उशीर होईल. मतदान मोजणीच्या दिवशी सकाळी 7 वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत EVM यंत्रे मतमोजणीसाठी स्ट्राँग रुममधून बाहेर येथील, मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी असणार आहेत. एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे. तर एका विधानसभा मतदारसंघातील 5 VVPAT मशिनची मते, प्रत्यक्ष EVM ची मते यांची पडताळणी करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. तर VVPAT मते, प्रत्यक्ष EVM मते यात फरक आढळल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला कळवणार आहे. त्यानंतर आयोग यावर अंतिम निर्णय देईल. तर दुसरीकडे मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर पूर्ण  बंदी टाकण्यात आली आहे. सोबतच आज 23 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रथम  पोस्टल मतदानाची मोजणी होईल. असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

नागपूर पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर दौऱ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था

समृद्धी महामार्गात 1150 कोटींचा घोटाळा! अंबादास दानवे यांचा आरोप

रिंकू सिंग टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला, वडिलांची प्रकृती गंभीर

महाराष्ट्र सरकार कडून कुरिअर कंपन्यांवरही MCOCA लादण्याचे संकेत

पुढील लेख
Show comments