Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अटलजी यांच्या वेळी कारगिल झाले मात्र त्यांनी त्याचा बाजार मांडला नाही - राज ठाकरे

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2019 (10:41 IST)
पाकीस्थानचा प्रधानमंत्री इम्रान खान यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावे असं वाटतं?’ आजपर्यंत हे असे कधीही झाले नाही. तसेच स्वर्गीय अटलजींच्या वेळीही कारगिल युद्ध झाले होते, मात्र त्यांनी मोदींसारखा त्याचा कधीही याचा असा बाजार मांडला नाही, अशी अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.   
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःच्या दत्तक घेतलेल्या गावाचा विकास करता आला नाही, ते देशाचा काय विकास करणार? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. रायगड येथील आपल्या जाहीर सभेत बोलत होते. राज म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार म्हणून जे गाव दत्तक घेतले होते, त्या गावात काहीच घडले नाही. गावात एकही सुविधा आली नाही. तेथील नालेही साफ होऊ शकले नाही. तेथे महाविद्यालय किंवा दवाखान्याचीह सोय नाही. स्वतः दत्तक घेतलेले गाव नीट करू शकला नाही, तर तुम्ही देशाचा काय विकास करणार?’आता नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखे काहीच उरले नाही, त्यामुळेच ते पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत, असाही आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे भाजपवर प्रत्येक सभेत जोरदार टीका करत आहेत.
 

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments